शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

By admin | Updated: May 1, 2017 02:21 IST

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

वाशिम : स्वत: विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण करणाऱ्या भगवान शंकराची करुणा आदि शंकराचार्यांच्या हृदयात वास करीत होती. त्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करीत सनातन धर्माची (सध्याचा हिंदू धर्म) स्थापना केली. त्याच चतु:सूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देशातील १२५ कोटी जनतेने राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी केले.स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आदि शंकराचार्य यांचा जयंती महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास श्रुतिसागर आश्रम, फुलगाव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्यासह श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ. रामराव महाराज, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूरचे संत बाबा महाराज तराणेकर, वासुदेव आश्रम अभ्यासिका वाशिमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती; केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुढे बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की पूर्वीच्या सनातन धर्माचे आधुनिक रुप म्हणजे हिंदू होय. त्यावरूनच देशाचे नाव हिंदुस्थान पडले. ही देण आदि शंकराचार्यांची आहे. शंकराचार्यांच्या हृदयात साक्षात भगवान शंकराप्रमाणे करुणा होती. त्यांनी आपल्या आयुष्यात सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून विश्वकल्याणाची मनीषा बाळगली. त्यांच्या त्याच आदर्श विचारांना प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्थान देऊन राष्ट्रनिर्माणाचे ध्येय बाळगावे, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी केले. स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनीही उपस्थितांना मागदर्शन केले. याप्रसंगी भगवतत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्काराने बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज यांना; तर वेदसंवर्धन पुरस्काराने वे.शा.सं. वाजपेयाजी चैतन्य नारायण काळे (सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गठित करण्यात आलेल्या विविध नियोजन समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सरसंघचालकांनी केला वाशिमकरांचा सन्मान!कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वाशिमकरांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे सांगून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाशिमकरांचा यावेळी सन्मान केला. संपूर्ण जिल्हावासीयांचा सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आयोजक अ‍ॅड. विजय जाधव आणि प्रा. दिलीप जोशी यांचा सत्कार सरसंघचालकांनी केला.