शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

By admin | Updated: May 1, 2017 02:21 IST

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

वाशिम : स्वत: विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण करणाऱ्या भगवान शंकराची करुणा आदि शंकराचार्यांच्या हृदयात वास करीत होती. त्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करीत सनातन धर्माची (सध्याचा हिंदू धर्म) स्थापना केली. त्याच चतु:सूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देशातील १२५ कोटी जनतेने राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी केले.स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आदि शंकराचार्य यांचा जयंती महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास श्रुतिसागर आश्रम, फुलगाव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्यासह श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ. रामराव महाराज, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूरचे संत बाबा महाराज तराणेकर, वासुदेव आश्रम अभ्यासिका वाशिमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती; केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुढे बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की पूर्वीच्या सनातन धर्माचे आधुनिक रुप म्हणजे हिंदू होय. त्यावरूनच देशाचे नाव हिंदुस्थान पडले. ही देण आदि शंकराचार्यांची आहे. शंकराचार्यांच्या हृदयात साक्षात भगवान शंकराप्रमाणे करुणा होती. त्यांनी आपल्या आयुष्यात सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून विश्वकल्याणाची मनीषा बाळगली. त्यांच्या त्याच आदर्श विचारांना प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्थान देऊन राष्ट्रनिर्माणाचे ध्येय बाळगावे, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी केले. स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनीही उपस्थितांना मागदर्शन केले. याप्रसंगी भगवतत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्काराने बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज यांना; तर वेदसंवर्धन पुरस्काराने वे.शा.सं. वाजपेयाजी चैतन्य नारायण काळे (सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गठित करण्यात आलेल्या विविध नियोजन समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सरसंघचालकांनी केला वाशिमकरांचा सन्मान!कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वाशिमकरांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे सांगून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाशिमकरांचा यावेळी सन्मान केला. संपूर्ण जिल्हावासीयांचा सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आयोजक अ‍ॅड. विजय जाधव आणि प्रा. दिलीप जोशी यांचा सत्कार सरसंघचालकांनी केला.