शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

संचारबंदीच्या काळात सात हजार पॉझिटिव्ह; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु, संचारबंदीच्या १५ दिवसातही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु, संचारबंदीच्या १५ दिवसातही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. ३१ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान नव्याने ४,१४६ रुग्णांची भर पडली तर, १५ एप्रिल ते १ मे यादरम्यान तब्बल ७,२८३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

राज्यासह देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला निर्बंध कठोर केले. त्यानंतर संचारबंदी लागू केली. १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. मात्र, संचारबंदीच्या काळातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान नव्याने ४,१४६ रुग्णांची भर पडली तर, १५ एप्रिल ते १ मे यादरम्यान तब्बल ७,२८३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र, हा वेग कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात दैनंदिन सरासरी २,७०० कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. संचारबंदी नियमाचे पालन केले जात आहे. मात्र, सकाळी १० वाजतादरम्यान बाजारपेठांमध्ये गर्दी कायम राहत असल्याचे दिसून येते. संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाज असतानाच, रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते.

०००००

३१ मार्च ते १४ एप्रिल

एकूण रुग्ण ४,१४६

बरे झाले ३,८५३

पॉझिटिव्ह रेट १२

कोरोनामुक्तीचा दर १०

००००००००

१५ एप्रिल ते ३० एप्रिल

एकूण रुग्ण ७,२८३

बरे झाले ६,२३१

पॉझिटिव्ह रेट १३

कोरोनामुक्तीचा दर ११