शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त

By admin | Updated: October 14, 2014 01:49 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त.

वाशिम : १५ ऑक्टोबर रोजीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेने केलेल्या चाचपणीतून जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रे उपद्रवी व संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने परिपूर्ण तयारीचा अंतिम टप्पाही पूर्ण केला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या ४00 जवांनाचा ताफा जिल्ह्यात दाखल झाला असून, स्थानिक पोलिस दलाचे १0६५ आणि गृहरक्षक दलाचे ३५0 जवानही तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यात ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांची संख्या आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८७ हजार ७६९, वाशिम मतदारसंघात ३ लाख २२ हजार ९३४, तर कारंजा मतदारसंघात २ लाख ८६ हजार २२ अशी मतदारसंख्या आहे. जिल्ह्यात ९६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी रिसोड मतदारसंघात ३0९, वाशिम ३३९ व कारंजा मतदारसंघात ३१७ मतदान केंद्रे आहेत. उमेदवार आता छुप्या प्रचाराद्वारे मतदारांना आपलेसे करण्यात गुंतले आहेत. दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्रांची चाचपणी करीत आहे. संवेदनशील मतदान केंद्राची नोंद असलेल्या गावांमधून पोलिस प्रशासनाच्या वतीने रूट मार्चही काढण्यात आला आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघात नऊ मतदान केंद्रांची नोंद संवेदनशील म्हणून झाली आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील १२ आणि कारंजा मतदारसंघात सर्वाधिक १६ मतदान केंद्रे पोलिस प्रशासनाच्या दप्तरी संवेदनशील आहेत.