शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

एम.एस.गोटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही.एन. लांडे यांची ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही.एन. लांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.आर. तनपुरे यांनी केले. त्यांनी भारताच्या पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत झालेल्या विविध चळवळींचा आणि स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये १८५७ चा रणसंग्राम ते १९४२ च्या चलेजाव आंदोलनापर्यंत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, मदनलाल धिंग्रा व सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल घटनावर माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. व्ही.एन. लांडे यांनी १८५७ च्या उठावातील नानासाहेब पेशवे ,राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, तात्या टोपे, बहादूरशहा जफर यांच्या कार्याची माहिती दिली. युवकांनी अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचा आदर्श घेऊन देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. डॉ. जी.एस. कुबडे व संजय गोटे यांनी आज देशाला भारताच्या वास्तविक इतिहासाची, मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव व जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार रासेयो सह कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. फिरोज खान, डॉ. एस. व्ही. रूक्के, डॉ. डी.आर. दामोदर, डॉ. डी. एन. लांजेवार, डॉ. व्ही. ई. डोणगांवकर, प्रा. बी. डी. पट्टेबहाद्दूर, डॉ. आर. जी. बोंडे आदींची उपस्थिती होती.