शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांच्या चळवळीला मिळणार नवी उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

सुनील काकडे वाशिम : ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटांची निर्मिती करण्यासह प्रशिक्षण देऊन महिलांना उद्योगांसाठी सज्ज करण्यासाठी उमेद अभियानातून ...

सुनील काकडे

वाशिम : ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटांची निर्मिती करण्यासह प्रशिक्षण देऊन महिलांना उद्योगांसाठी सज्ज करण्यासाठी उमेद अभियानातून जिल्ह्यात ६८ वर्धिनींना नेमणूक देण्यात आलेली आहे. कोरोना संकटामुळे वर्धिनींची कामे सुमारे दीड वर्षापासून थांबली होती. परिणामी, त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ सप्टेंबरच्या अंकात राज्यातील तीन हजारांवर वर्धिनी मानधनापासून वंचित, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेण्यात आली असून २३ सप्टेंबरपासून वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योगे बचत गटांच्या चळवळीलाही नवी उभारी मिळणार आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून त्यांना उपजीविकेच्या संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करण्यात आले. याअंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशू सखी, ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी आदी विभाग निर्माण करून कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरण्यात आले. सोबतच खेडेगावात बचतगट स्थापनेविषयी प्रभावी जनजागृती करण्यासह महिलांचा बचत गटांमध्ये सहभाग निश्चित करणे, त्यांना बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी वर्धिनींना नेमणूक देण्यात आली; मात्र कोरोनाचे उद्भवलेले संकट पाहता वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे मात्र काम नाही तर दाम नाही, यानुसार जिल्ह्यातील ६८ वर्धिनींचा रोजगार हिरावला गेला. यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेण्यात आली असून २३ सप्टेंबरपासून वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

..................

कोट :

ग्रामीण भागात महिला बचत गटांना जाणवणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात ६८ वर्धिनींना नेमणूक देण्यात आलेली आहे. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे वर्धिनींच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र संकट बहुतांशी निवळल्याने कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या अटीवर वर्धिनींची कामे २३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- सुधीर खुजे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, वाशिम