शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

१२१०० हेक्टरवर महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:43 IST

वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी या हंगामाची तयारी केली असून, दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानेही ...

वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी या हंगामाची तयारी केली असून, दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानेही (महाबीज) खरीप बीजोत्पादन कार्यक्रमाची आखणी केली आहे. यंदा १२१०० हेक्टरवर बीजोत्पादनाची आरक्षण योजना असून, शेतकऱ्यांना यात सहभागी होण्यासाठी २० मे ही अंतिम मुदत आहे.

वाशिम जिल्ह्यात महाबीजकडून दरवर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात बीजोत्पादन प्रकल्प राबविण्यात येतो. खरीप हंगामात तूर, ज्वारी, उडीद, सोयाबीन, आदी पिकांचे बीजोत्पादन महाबीजकडून केले जाते. यंदाही या बीजोत्पादन कार्यक्रमाची आखणी महाबीजने केली आहे. यामध्ये १२१०० हेक्टर क्षेत्रावर तूर, ज्वारी, उडीद, सोयाबीन बीजोत्पादन बियाण्याचे आरक्षण २० मे पर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी २० मे पूर्वी महाबीज जिल्हा व्यवस्थापक, क्षेत्र व्यवस्थापक यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन महाबीजकडून करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, ३ महिन्यातील सातबारा किंवा ८ अ ची प्रत मागणी अर्जासोबत जोडावी लागणार आहे.

-----------------

कोट:

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोलाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम जिल्ह्यात बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यात १२१०० हेक्टरवर सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, ज्यूट या पिकांच्या बीजोत्पादनाची आरक्षण योजना २० मेपर्यंत राबविली जात आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत मागणी अर्ज करून यात सहभागी व्हावे.

- डॉ. प्रशांत घावडे

जिल्हा व्यवस्थापक,

महाबीज वाशिम.