शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदतीचा ओघ ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:43 IST

मालेगांव : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गावखेड्यापर्यंत सर्वांनी मदतीचा हात पुढे केला; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. ...

मालेगांव : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गावखेड्यापर्यंत सर्वांनी मदतीचा हात पुढे केला; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदतीचा ओघ ओसरला असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे.

मागील लॉकडाऊनमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व समाजातील दानशूर नागरिकांनी गोरगरीब, गरजू, विधवा, परितक्त्यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, साखर, पीठ, तूरडाळ, आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्वजण काळजी घेत होते. मात्र, यंदा संचारबंदीत कोरोनामुळे गोरगरीब, मजुरांकडे पैसे नसताना त्यांना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे. दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो सेशन करणाऱ्यांनी यंदा मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावे, असा धान्य देणाऱ्यांचा समज झालेला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्धरीत्या तालुक्यातील गावागावांत नागरिकांना मदतीचा हात दिला. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरजवंतांना खरी मदतीची गरज आहे.

इनबॉक्स

राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते गेले कुठे?

गेल्यावर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली. मात्र, काहींनी केवळ फोटोसेशनपुरतीच मदत केली. त्यांनी मदत केल्याचा प्रचंड आव आणला. काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिकपणे मदत केली. अनेकांनी या मदतीचा थांगपत्ताही लागू दिला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्याची नितांत गरज आहे. मात्र, सर्व संघटना व कार्यकर्ते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इनबॉक्स

कुटुंबाना मानसिक आधाराची गरज

सध्याच्या या भयानक परिस्थितीत अनेकजण कोरोनाबाधित होत आहेत. शेजारचे लोक कोरोनाबाधित आल्याचे समजल्यावर दूर जात आहे. अशा वेळी आर्थिक मदत नाही, तर मानसिक आधाराची गरज आहे. किमान मदत नाही, तर मानसिक आधार द्यावा, असे मत व्यक्त होत आहे.