शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वाशिम जिल्हा विभागात दुसरा

By admin | Updated: June 9, 2015 02:16 IST

जिल्हय़ाचा निकाल ८९.0४ टक्के ; कारंजाच्या अनुराधा बियाणीने मारली बाजी.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने ८९.0४ टक्के घेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ५८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २0 हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८९.0४ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४२८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५४९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १८ हजार २९८ विद्यार्थ्यांमध्ये १0१0५ मुले व ८१९३ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.२५ तर मुलींची टक्केवारी ९१.३५ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. वाशिम तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. वाशिम तालुका ९0.६२, मालेगाव तालुका ८८.२४, रिसोड तालुका ९0.३१, कारंजा तालुका ८७.५५, मंगरुळपीर तालुका ८६.७५, मानोरा तालुक्याचा ८९.३८ टक्के निकाल लागला आहे. वाशिम तालुक्यातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४५0३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालेगाव तालुक्यात २६७८ पैकी २३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. रिसोड ४३४३ पैकी ३९२२, कारंजा ३६६३ पैकी ३२0७, मंगरुळपीर २८१६ पैकी २४४३ तर मानोरा तालुक्यातून २0८१ पैकी १८६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. जिल्हय़ातील शाळांच्या लागलेल्या निकालामध्ये ४0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. वाशिम तालुक्याचा सर्वाधिक तर मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४५४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८0 ते ८५ टक्के गुण घेणारे विद्यार्थी संख्या ९१२५ इतकी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालात २0 टक्केच्या आत निकाल लागलेली एकही शाळा नसून, गतवर्षी ४0 पेक्षा जास्त शाळांचा निकाल २0 टक्क्याच्या आतमध्ये लागला होता.

*मयुरी मागासवर्गीयातून विभागात प्रथम

          माध्यामिक शालांत परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरची मयुरी गजानन डाबेराव हिने ९७.८0 टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून विभागात प्रथम आल्याची माहिती मयुरीचे वडील तथा कारंजा येथील गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी दिली. तसेच याच शाळेची अनुराधा माणिकचंद बियाणी हिने ९८.६0 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अनुराधा जिल्हय़ातून पहिल्या क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.