शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

वाशिम जिल्हा विभागात दुसरा

By admin | Updated: June 9, 2015 02:16 IST

जिल्हय़ाचा निकाल ८९.0४ टक्के ; कारंजाच्या अनुराधा बियाणीने मारली बाजी.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने ८९.0४ टक्के घेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ५८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २0 हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८९.0४ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४२८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५४९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १८ हजार २९८ विद्यार्थ्यांमध्ये १0१0५ मुले व ८१९३ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.२५ तर मुलींची टक्केवारी ९१.३५ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. वाशिम तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. वाशिम तालुका ९0.६२, मालेगाव तालुका ८८.२४, रिसोड तालुका ९0.३१, कारंजा तालुका ८७.५५, मंगरुळपीर तालुका ८६.७५, मानोरा तालुक्याचा ८९.३८ टक्के निकाल लागला आहे. वाशिम तालुक्यातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४५0३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालेगाव तालुक्यात २६७८ पैकी २३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. रिसोड ४३४३ पैकी ३९२२, कारंजा ३६६३ पैकी ३२0७, मंगरुळपीर २८१६ पैकी २४४३ तर मानोरा तालुक्यातून २0८१ पैकी १८६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. जिल्हय़ातील शाळांच्या लागलेल्या निकालामध्ये ४0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. वाशिम तालुक्याचा सर्वाधिक तर मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४५४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८0 ते ८५ टक्के गुण घेणारे विद्यार्थी संख्या ९१२५ इतकी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालात २0 टक्केच्या आत निकाल लागलेली एकही शाळा नसून, गतवर्षी ४0 पेक्षा जास्त शाळांचा निकाल २0 टक्क्याच्या आतमध्ये लागला होता.

*मयुरी मागासवर्गीयातून विभागात प्रथम

          माध्यामिक शालांत परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरची मयुरी गजानन डाबेराव हिने ९७.८0 टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून विभागात प्रथम आल्याची माहिती मयुरीचे वडील तथा कारंजा येथील गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी दिली. तसेच याच शाळेची अनुराधा माणिकचंद बियाणी हिने ९८.६0 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अनुराधा जिल्हय़ातून पहिल्या क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.