शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा विभागात दुसरा

By admin | Updated: June 9, 2015 02:16 IST

जिल्हय़ाचा निकाल ८९.0४ टक्के ; कारंजाच्या अनुराधा बियाणीने मारली बाजी.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने ८९.0४ टक्के घेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ५८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २0 हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८९.0४ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४२८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५४९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १८ हजार २९८ विद्यार्थ्यांमध्ये १0१0५ मुले व ८१९३ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.२५ तर मुलींची टक्केवारी ९१.३५ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. वाशिम तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. वाशिम तालुका ९0.६२, मालेगाव तालुका ८८.२४, रिसोड तालुका ९0.३१, कारंजा तालुका ८७.५५, मंगरुळपीर तालुका ८६.७५, मानोरा तालुक्याचा ८९.३८ टक्के निकाल लागला आहे. वाशिम तालुक्यातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४५0३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालेगाव तालुक्यात २६७८ पैकी २३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. रिसोड ४३४३ पैकी ३९२२, कारंजा ३६६३ पैकी ३२0७, मंगरुळपीर २८१६ पैकी २४४३ तर मानोरा तालुक्यातून २0८१ पैकी १८६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. जिल्हय़ातील शाळांच्या लागलेल्या निकालामध्ये ४0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. वाशिम तालुक्याचा सर्वाधिक तर मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४५४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८0 ते ८५ टक्के गुण घेणारे विद्यार्थी संख्या ९१२५ इतकी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालात २0 टक्केच्या आत निकाल लागलेली एकही शाळा नसून, गतवर्षी ४0 पेक्षा जास्त शाळांचा निकाल २0 टक्क्याच्या आतमध्ये लागला होता.

*मयुरी मागासवर्गीयातून विभागात प्रथम

          माध्यामिक शालांत परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरची मयुरी गजानन डाबेराव हिने ९७.८0 टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून विभागात प्रथम आल्याची माहिती मयुरीचे वडील तथा कारंजा येथील गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी दिली. तसेच याच शाळेची अनुराधा माणिकचंद बियाणी हिने ९८.६0 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अनुराधा जिल्हय़ातून पहिल्या क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.