शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

जलस्वराज्यच्या दुसर्‍या टप्प्यात वाशिम जिल्ह्याला ‘खो’

By admin | Updated: June 5, 2014 23:30 IST

वाशिम जिल्ह्यातील जलस्वराज्य मोहीमे अतर्गत पात्र गावे राहणार वंचित.

वाशिम : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजलाचा पुरवठा व्हावा व विशेष पाणी टंचाईतून त्यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ५00 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हयाच्या समावेश करण्यात आला. तथापि, जलस्वराज्य योजनेचा पहिला टप्पा राबविलेल्या वाशिम जिल्हयाचा या योनजेत समावेश न करुन खो देण्यात आला आहे.यामुळे जिल्हयातील ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली गावे ती सुविधा होण्यापासून वंचित राहणार आहेत. जलस्वराज्य योजनेच्या सन २00४ ते २0११ दरम्यान राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्यात जिल्हयातील १0५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली.त्या टप्प्यात लहान-मोठी गावे घेऊन स्थानिक पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत कामे करून घेण्यात आली.त्याचा या गावामधील हजारो लोकांना लाभ मिळाला.           आता जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्यात ५00 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टंचाईग्रस्त गावे व वाडया(वस्त्या)करिता टंचाई कालावधीसाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील रायगड, रत्नागिरी पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर व चंद्रपूर या १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.          सदर टप्प्यासाठी निवड झालेल्या राज्यातील १२ जिल्ह्यामधील मागील तीन वर्षात टंचाईस्थिती असणार्‍या व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आलेल्या व इतर कोणत्याही स्वरुपाची नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित नसलेल्या गावांमध्ये योजनेची कामे केली जाणार आहेत.           वाशिम जिल्हयात ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची १२८ गावे आहेत त्यापैकी कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली तब्बल ९१ गावे आहेत. त्यापैकी अनेक गावातील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळयात गावातील विहिरी आटल्यामुळे दुरवरच्या विहिरींवरुन पाणी आणावे लागते. या टप्प्यात जिल्हयाचा समावेश झाला असता तर या गावांना योजनेचा लाभ मिळून तेथील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली असती.