शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जलस्वराज्यच्या दुसर्‍या टप्प्यात वाशिम जिल्ह्याला ‘खो’

By admin | Updated: June 5, 2014 23:30 IST

वाशिम जिल्ह्यातील जलस्वराज्य मोहीमे अतर्गत पात्र गावे राहणार वंचित.

वाशिम : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजलाचा पुरवठा व्हावा व विशेष पाणी टंचाईतून त्यांची सुटका व्हावी यासाठी राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ५00 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हयाच्या समावेश करण्यात आला. तथापि, जलस्वराज्य योजनेचा पहिला टप्पा राबविलेल्या वाशिम जिल्हयाचा या योनजेत समावेश न करुन खो देण्यात आला आहे.यामुळे जिल्हयातील ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली गावे ती सुविधा होण्यापासून वंचित राहणार आहेत. जलस्वराज्य योजनेच्या सन २00४ ते २0११ दरम्यान राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्यात जिल्हयातील १0५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली.त्या टप्प्यात लहान-मोठी गावे घेऊन स्थानिक पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत कामे करून घेण्यात आली.त्याचा या गावामधील हजारो लोकांना लाभ मिळाला.           आता जलस्वराज्य योजनेच्या दुसर्‍या टप्यात ५00 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टंचाईग्रस्त गावे व वाडया(वस्त्या)करिता टंचाई कालावधीसाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील रायगड, रत्नागिरी पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर व चंद्रपूर या १२ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.          सदर टप्प्यासाठी निवड झालेल्या राज्यातील १२ जिल्ह्यामधील मागील तीन वर्षात टंचाईस्थिती असणार्‍या व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आलेल्या व इतर कोणत्याही स्वरुपाची नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित नसलेल्या गावांमध्ये योजनेची कामे केली जाणार आहेत.           वाशिम जिल्हयात ५00 पेक्षा कमी लोकसंख्येची १२८ गावे आहेत त्यापैकी कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेली तब्बल ९१ गावे आहेत. त्यापैकी अनेक गावातील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळयात गावातील विहिरी आटल्यामुळे दुरवरच्या विहिरींवरुन पाणी आणावे लागते. या टप्प्यात जिल्हयाचा समावेश झाला असता तर या गावांना योजनेचा लाभ मिळून तेथील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली असती.