शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सातबा-याचे संकेतस्थळ तीन दिवसांपासून बंद!

By admin | Updated: March 18, 2016 02:02 IST

सर्व्हर ठप्प असल्यामुळे शेतक-यांना सोसावा लागतो भुर्दंड.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडशेतक-यांना सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले; परंतु ऑनलाइन सातबारा यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. याचा भुदर्ंड दूरवरून येणार्‍या शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एका दिवसात सातबारा मिळत असल्याने शेतकरी याचा लाभ घेत आहेत; परंतु मागील तीन दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. शेतकरी कॉम्प्युटर केंद्रावर वेळोवेळी येत आहेत, आणि त्यांना यंत्रणा बंद पडल्याचे कारण सांगून बाहेर पाठविले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.विविध ठिकाणच्या कॉम्प्युटर केंद्रांवर झेरॉक्स मशीन, ऑनलाइन सातबारासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तहसील कार्यालयात आलेल्या शेतकर्‍याला बाहेर अशी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावरून नि:शुल्क सातबारा काढता येतो; परंतु शेतकर्‍यांच्या घरी संगणक नसल्याने त्यांना नेट कॅफे किंवा एखाद्या कॉम्प्युटर केंद्रात जावे लागते. त्या ठिकाणी शेतकर्‍याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ऑनलाइन सातबारा काढून देण्यासाठी २0, ३0, ५0, ते १00 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. अशा प्रकारे शेतकर्‍यांना १५0 ते २00 रुपये खर्च करावे लागत आहे. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ऑनलाइन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र, सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाइट वारंवार हँग होत आहे. त्यामुळे सातबारा काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी ऑनलाइन सातबारा शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.