शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:26 IST

वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी हा ...

वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी हा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरित २० टक्के शाळांना लवकरच गुणदान प्रकियेचा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. दहावीच्या निकालास उशीर झाल्यास संबंधित शाळाच जबाबदार राहतील, असा इशारा शिक्षण विभागाने दिला.

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या ३६३ शाळा असून, जवळपास ८० टक्के शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

०००००००००००००

दहावीतील एकूण विद्यार्थी १९७१५

मुले १०६४६

मुली ९०६९

००००००

८० टक्के शाळांनी टप्पा पूर्ण केला

१) जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा आहेत. निकाल वेळेवर लागावा याकरिता गुणदान प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापक, संबंधित शिक्षकांना दिल्या होत्या.

२) निर्बंधाच्या कालावधीतही दहावी व बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन प्रक्रिया, गुणदानाच्या कामासाठी शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले होते.

३) आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के शाळांनी गुणदान प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरित शाळांनी तातडीने टप्पा पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

०००००

कोट (शिक्षणाधिकारी)

यंदा कोरोनामुळे शासनाने दहावी, बारावीची परीक्षा रद्द केली. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया असून, संबंधित शिक्षकांनी वेळेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, याबाबत सर्वांना सूचना दिल्या. ऑनलाईन पद्धतीने आढावादेखील घेण्यात आल्या. निकालास विलंब झाला, तर त्याला संबंधित शाळाच जबाबदार राहतील, असा इशाराही दिला होता. आतापर्यंत ८० टक्के शाळांनी गुणदान प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

००००००००००

वेळेवर प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न

निर्बंध, तांत्रिक अडचणी यामुळे कधी-कधी व्यत्ययही आला. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

- दीपक अवचार, शिक्षक

०००

गुणदान प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागले. वेळेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली.

- विलास खोरणे

शिक्षक