शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

By admin | Updated: April 21, 2017 01:21 IST

रिसोड- येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.

शितल धांडे - रिसोडरिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.गत सहा महिन्यांपासून औषध निर्माता अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांचे जागेवर इतर कर्मचाऱ्यांना बसवून औषधी वाटपाचे काम सुरु आहे. चतुर्थ श्रेणीतील एक पद रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कर्तव्याव्यतिरिक्त अतिरिक्त काम करावे लागत आहे. तीन वर्षापासून एक्सरे मशीन बंद पडल्याने क्ष -किरण कक्ष नेहमी बंद असतो. शासन दरबारी पाठपुरावा करुन एक्सरे मशीन मंजूर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु मशीन उपलब्ध झाल्याबरोबर मशीनला आॅपरेट करणयासाठी एक्सरे तंत्रज्ञ, मदतनिस, तज्ञ डॉक्टर ही पदे भरणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आज रोजी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संपूर्ण भार असून त्यांच्याकडेच वैद्यकीय अधिक्षकांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. महत्वपूर्ण आजारांच्या उपचारासाठी लागणारी औषधींचाही तुटवडा आहे.खोकल्यांचे औषध व अ‍ॅण्टीरॅबीज (श्वान दंश) लस गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध नसल्याने श्वानदंश झालेल्या रुग्णांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून बोअरवेल घेण्यात आला. बोअरची जलपातळी खोल गेल्याने मोजकेच पाणी येत आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वापरासाठी लागणारे पाणी मिळत नाही. अन्य ठिकाणावरून रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी आणावे लागत आहे. रुग्णालय परिसरात असलेले शवविच्छेदन गृह मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. या शवविच्छेदन गृहापर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका नेता येत नाही. शवविच्छेदनासाठी आणलेले प्रेत स्ट्रेचरवर टाकुन न्यावे लागते. शवविच्छेदन गृहातील विज क नेक्शन बंद असल्याने रात्री अंधार राहतो. त्या कारणाने रात्री शवविच्छेदन होत नाही. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे मृतकाचे शवविच्छेदन केल्यानंतर पाणी आवश्यक असते. परंतु या ठिकाणी स्वतंत्र्य अथवा बोअरची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दुरवरुन पाणी आणावे लागते. याकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे४रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची सुविधा निर्माण केली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्याने आरोग्य सेवा देताना कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही आरोग्य केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.वैद्यकीय अधिक्षकांसह वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात यापुर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविला आहे. अधिकारी, कर्मचारी व आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेकडून काम करुन घेतांना मोठी कसरत करावी लागत आहे.- डॉ.श्रीधर चोपडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय , रिसोड.शवविच्छेदन गृहात आवश्यक लागणारी सुविधा उपलब्ध नसणे ही बाब फार गंभीर आहे. महत्वपूर्ण असलेल्या या समस्येकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. फार पुर्वीपासून याबाबत पाठपुरावा सुध्दा केला. परंतु काहीच सुधारणा झाली नाही. अनेक वेळा संबंधितांनी येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनाही स्वत:च्या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येते. पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.- डॉ.जयप्रकाश बगडे, रिसोड