शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

By admin | Updated: August 26, 2015 01:38 IST

मनोधैर्यचा आधार ; तीन अल्पवयीन मुलींचे समुपदेशनाद्वारे पुनर्वसन.

नीलेश जोशी /वाशिम : महिला अत्याचारांचे वाढते प्रमाण व त्यामुळे पूर्णत: खचून जाणार्‍या महिलांचे पुन्हा समाजात योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील बलात्कार पीडित महिलांसोबतच, अल्पवयीन मुली आणि तीन मुलांना येत्या काळात प्रत्येकी किमान दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. आतापर्यंत २९ पीडितांना मदत करण्यात आली आहे. एकूण सव्वा कोटीची मदत पीडितांना दिली जाणार आहे. दरम्यान, यातील निम्मी रक्कम २९ पीडित महिलांना देण्यात आली असून, राज्यस्तरावरून उर्वरित प्रकरणात अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने त्यांना मदतीची अद्याप प्रतीक्षा आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अँसिड हल्ल्याच्या प्रकरणात गुन्हेगारांना गंभीर शासन करण्यात येत असले तरी अशा घटनांमध्ये पीडित महिला, युवतींचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. समाजातही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. त्यामुळे अशा प्रकरणात जिल्हास्तरावरील क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळाच्या माध्यमातून प्रकरणाची गंभिरता विचारात घेता किमान दोन लाख ते तीन लाख रुपयांपर्यंतची मदत पीडित व्यक्तीला केली जाते. सोबतच समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्यासोबतच, त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य केले जाते. राज्यात दोन ऑक्टोबर २0१३ पासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील या घटनांचा आढावा घेतला असता २0 महिन्यात वाशिम जिल्ह्यात ८५ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बलात्कार होण्याच्या या घटनांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्नही जिल्ह्यात गंभीर बनत आहे. फूस लावून पळवणे, लैंगिक अत्याचार, जबरी संभोग अशा प्रकारचे अत्याचार या मुलींवर झाले आहेत.