शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:01 IST

बई मंत्रालयात राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक आणि याच अनुषंगाने १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेण्यात आली.

वाशिम : राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही यापुढे पिकांची भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात १४ फेब्रुवारी रोजी खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक आणि याच अनुषंगाने १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेण्यात आली.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाचे काम करताना कारंजा तालुक्यात शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकºयांना नुकसानभरपाई, अपघातामुळे मृत व अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी लावून धरली होती. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे शेतकºयांच्या पिकांची नुकसान भरपाई व मृत आणि अपंगत्व आलेल्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्यावतीने पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी १८ फेब्रुवारीला दिले. खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे जेएमडी ए.बी. गायकवाड, वाशिमचे उपजिल्हाधिकारी निलेश खोडके, टिम लिडर राणा प्रसाद, पीएनसी कंपनीचे संचालक सुभाष इंगळे, अधीक्षक अभियंता गजानन पळसकर आदींची उपस्थिती होती.सदर बैठकीत नागपूर ते मुंबई राज्य महामार्गासंंबंधीत तक्रारींवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात एमएसआरडीचे ए.बी. गायकवाड यांनी समृध्दी महामागार्संबंधीत एक महिन्याचा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठकमुंबई येथील बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीला आढावा बैठक घेण्यात आली. समृध्दी महामार्ग योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्ते खोदकामातील धुळीमुळे लगतच्या शेतातील गोभी, टमाटे, वांगे, पालेभाज्या, तुर, हरभरा, गहु आदी पिकाचे नुकसान झाले आहे. या कामामध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले. खासदार भावना यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांनी एकत्रित पाहणी व पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिले. खासदार गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे व जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे लवकरच समृध्दी कामात मृत, अपंगत्व व पिकाचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग