शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

 समता परिषद राज्यात अवयव दानाची मोहीम राबविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 14:03 IST

वाशिम : राज्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे  माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले . ते  ७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल ...

वाशिम : राज्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे  माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले . ते  ७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल वाशिमकर  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते . 

ते म्हणाले की एका व्यक्तीच्या अवयव दानाने किमान ६ व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे अवयव दानाचे महत्त्व समजावून सांगून अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याचे कार्य राज्यात राबविणार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद करणारआहे .छगनराव भुजबळ यांनी ओ बी सी च्या हक्कासाठी देश पातळीवर लढा उभारला .ते मनुवादी लोकांना सहन न झाल्याने खोटे आरोप करून त्यांनी भुजबळ यांना तुरुंगात टाकले .या संकटातून ते बाहेर पडतील असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिपादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केले त्यांनी छगनराव भुजबळ यांनी ओबीसी साठी केलेल्या कायार्ची माहिती दिली .या बैठकीला समता परिषदेचे मार्गदर्शक रवी सोनवणे , जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,माजी जिल्हा अध्यक्ष नारायणराव जाधव ,जिल्हा उपअध्यक्ष लक्ष्मणराव जवके, रायुकॉचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव, राऊत, सेवाराम आडे ,लक्ष्मणराव जवके ,विलासराव रोकडे ,जिल्हासचिव विठ्ठल भागवत ,  जिल्हा संघटक गजानन टोंपे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष गोमाशे माजी जिल्हा अध्यक्ष नारायणराव जाधव , शहर अध्यक्ष संतोष कदम  ,मानोरा तालुका अध्यक्ष धनराज दिघडे ,रिसोड तालुकाअध्यक्ष संतोष मडके , माजी नगरसेवक अरुण क्षीरसागर , जयंत इरतकर ,भागवत बोराटे , बी टी खोटें गोपालराव जाधव,,अनिल खोटे,गोरखनाथ भागवत, संजय भागवत ,गजानन बुधे महेश वानखेडे,कितीर्कुमार गावंडे, ज्ञानेश्वर वाशीमकरअमोल भालेराव ,अजय खोटे राहुल गाभणे, अमर गाभणे आदी होते.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब भुजबळ होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन संतोष गोमाशे यांनी केले.