शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलिज ऑर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न ...

वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलिज ऑर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाणाच्या २७० पॅकेटची विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरुवारी दिले आहेत. या कारवाईमुळे कृषिसेवा केंद्रांचे धाबे दणाणले असून, अनियमितता करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही कृषी विभागाने दिला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांच्या पथकाने १९ मे रोजी वाशिम शहरातील तीन कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान १८ मे २०२१ रोजी विविध आठ कंपन्यांच्या पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाणाचे आवश्यक दस्ताऐवजाची मागणी केली असता दस्ताऐवज उपलब्ध झाले नाहीत. यामुळे सोयाबीनच्या १८४६ बॅगची (किंमत ४४.९० लाख) विक्री थांबविण्यात आली आहे. या साठ्यास विक्री बंदचे आदेश देतानाच, पुढील तीन दिवसात आवश्यक कागदपत्रे, रिलिज ऑर्डर दाखविण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला. २० मे रोजी मंगरूळपीर येथील चार कृषिसेवा केंद्रांची तपासणी केली असता, रिलिज ऑर्डर व अन्य कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या ३०० बॅग तसेच कापूस बियाणाची २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश दिले. बियाणे नमुने तपासणीसाठी बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई करताना जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक भद्रोड यांच्यासमवेत तंत्र अधिकारी प्रकाश पल्लेवाड उपस्थित होते.

०००

‘रिलिज ऑर्डर’ बंधनकारक !

विविध कंपन्यांचे सोयाबीन, कपाशी बियाणे विक्रीसाठी बाजारात आले आहे. बियाणे खरेदी केल्यानंतर यासंदर्भातील रिलिज ऑर्डर, बिल अशी कागदपत्रे असल्याशिवाय बियाणांची विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याची पडताळणी म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेकडून कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेण्यात येत आहे. गत दोन दिवसांत सात कृषिसेवा केंद्रांकडे रिलिज ऑर्डर व बिल अशी कागदपत्रे आढळून आली नाहीत. रिलिज ऑर्डर बंधनकारक असून, कृषिसेवा केंद्रांनी याचे पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा कृषी विभागाने दिला.

००००००००