शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
3
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
4
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
5
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
6
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
7
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
8
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
9
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
10
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
11
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
12
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
13
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
14
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
15
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
16
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
17
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
18
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
19
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
20
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 

पाणीटंचाई निवारण उपाययोजनांसाठी धावपळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.  

ठळक मुद्देसर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार टंचाईसदृश स्थितीची माहिती मागवली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.  संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी मात्र, १६ सप्टेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७0 टक्केच पर्जन्यमान झाले असून, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघू अशा एकंदरित १२५ प्रकल्पांपैकी निम्म्यांपेक्षा अधिक प्रकल्पांची पाणीपातळी आजही २५ टक्क्यांपेक्षा खालीच आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विहिरी, हातपंप, कूपनलिकांच्या पाणीपातळीतही यंदा विशेष वाढ झालेली नाही. वाशिम शहराची वार्षिक गरज सहा दशलक्ष घनमीटरची असताना शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात, तर दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, जिल्ह्यातील इतर तालुके आणि ग्रामीण भागातही पाण्यासंदर्भातील चित्र अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचे चटके बसणे सुरू होतील, असा अंदाज वर्तविला जात असून, त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. यावर्षी नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उपाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जाणार असून, त्यास यंदा साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

जुमडा, कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमानवाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, तो साधारणत: डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी २0१८ ते जून २0१८ या सहा महिन्यांत शहरवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून नजिकच्या जुमडा आणि कोकलगाव बॅरेजमधील पाणी ‘ग्रॅव्हिटी पॉवर’ अथवा ‘पम्पिंग’द्वारे सोडण्याच्या हालचाली सध्या सुरू असून, शासनाकडून आवश्यक निधी मंजूर होताच, या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.

वाशिममध्ये जोरदार पावसाची हजेरीजिल्ह्यात यंदा ७0 टक्के पर्जन्यमान झाले असले, तरी वाशिम तालुक्यात मात्र तो ५५ टक्केच असून, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट यामुळे गडद होत असतानाच रविवारी शहर तथा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे एकबुर्जीमधील जलसाठा विशेष वाढणार नसला, तरी खरिपातील तूर आणि कपाशी या पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे मानले जात आहे.