शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारण उपाययोजनांसाठी धावपळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.  

ठळक मुद्देसर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार टंचाईसदृश स्थितीची माहिती मागवली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.  संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी मात्र, १६ सप्टेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७0 टक्केच पर्जन्यमान झाले असून, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघू अशा एकंदरित १२५ प्रकल्पांपैकी निम्म्यांपेक्षा अधिक प्रकल्पांची पाणीपातळी आजही २५ टक्क्यांपेक्षा खालीच आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विहिरी, हातपंप, कूपनलिकांच्या पाणीपातळीतही यंदा विशेष वाढ झालेली नाही. वाशिम शहराची वार्षिक गरज सहा दशलक्ष घनमीटरची असताना शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात, तर दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, जिल्ह्यातील इतर तालुके आणि ग्रामीण भागातही पाण्यासंदर्भातील चित्र अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचे चटके बसणे सुरू होतील, असा अंदाज वर्तविला जात असून, त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. यावर्षी नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उपाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जाणार असून, त्यास यंदा साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

जुमडा, कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमानवाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ दीड ते दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक असून, तो साधारणत: डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी २0१८ ते जून २0१८ या सहा महिन्यांत शहरवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून नजिकच्या जुमडा आणि कोकलगाव बॅरेजमधील पाणी ‘ग्रॅव्हिटी पॉवर’ अथवा ‘पम्पिंग’द्वारे सोडण्याच्या हालचाली सध्या सुरू असून, शासनाकडून आवश्यक निधी मंजूर होताच, या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.

वाशिममध्ये जोरदार पावसाची हजेरीजिल्ह्यात यंदा ७0 टक्के पर्जन्यमान झाले असले, तरी वाशिम तालुक्यात मात्र तो ५५ टक्केच असून, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट यामुळे गडद होत असतानाच रविवारी शहर तथा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे एकबुर्जीमधील जलसाठा विशेष वाढणार नसला, तरी खरिपातील तूर आणि कपाशी या पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे मानले जात आहे.