शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

लसीकरणाने काेराेना, मृत्यू , बुरशीचा आजार हाेण्याची ग्रामीण भागात अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात ...

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात कार्यरत आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या अफवांमुळे लसीकरणावरही परिणाम दिसून येत आहे.

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययाेजना केल्या जात आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापराबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काेराेनाकाळात सध्याच्या घडीला लस प्रभावी असून, लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहरात माेठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असताना ग्रामीण भागात मात्र लसीमुळे विविध आजार उद्‌भवतात, मृत्यू ओढवताे, लसीमुळेच ताप येऊन काेराेना हाेताे, बुरशीजन्य आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याच्या अफवा पसरत आहेत. आराेग्य विभागातर्फे गावागावांत लसीकरण काेराेनावर उपाययोजना करून, जास्तीत जास्त नागरिकांनी करून घेण्याचे आवाहन केले जात असताना याकडे ग्रामीण भागातील नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

....................

काय आहेत अफवा

काेराेना संसर्ग हाेताेय

ग्रामीण भागात सर्वात जास्त काेणत्या अफवेला पेव फुटले असेल तर लस घेतल्यानंतरच काेराेना संसर्ग हाेताे. यामध्ये सर्वाधिक वृध्द लाेकांचा समावेश असल्याचे दिसून आले.

मृत्यू ओढावताेय

लस घेतल्यानंतर काही जणांनाच ताप येत असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात काेराेना लस घेतल्यानंतर ताप येताेच व त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हाेत असल्याची काही जण चर्चा करताना दिसून येत आहे.

बुरशीजन्य आजार उद्‌भवताे

लसीकरणामुळे बुरशीजन्य आजार उद्‌भवत असल्याची चर्चा ग्रामीण भागात हाेत आहे. मला काहीच झाले नाही, आणि हाेणार नाही असे सांगून काही ग्रामस्थ लसीकरण करून कशाला आजार गळ्यात घ्यायचे, अशी चर्चा करीत आहेत.

...............

गावकरी संभ्रमात

लस घेतल्यानंतर विविध आजार होत असल्याची चर्चा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. यामुळे गावकरीसुध्दा संभ्रमात दिसून येत आहेत. यासंदर्भात काही गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता यावर काेणीही बाेलायला तयार नाही. आम्ही लस घेतल्याचे सांगत आहेत. काही जण तर लसीकरणाबाबत काहीही बाेलण्याचे टाळत आहेत.

............

ग्रामीण भागात लसीकरणामुळे विविध आजार होत असल्याची चर्चा, अफवा पसरत असली तरी लसीकरणच काेराेनावर प्रभावी उपाय आहे. लसीकरणामुळे अनेक जणांचा काेराेनापासून बचाव झाला आहे. नाहक अफवा पसरविणे गुन्हा आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व इतरांना परावृत्त करणे म्हणजेच काेराेना संसर्ग राेखणे शक्य होेईल.

- डाॅ. मधुकर राठाेड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम