शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने काेराेना, मृत्यू , बुरशीचा आजार हाेण्याची ग्रामीण भागात अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात ...

वाशिम : लसीकरण केल्यानंतर काेराेना, मृत्यू, बुरशीचा आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरत असल्याने या भागात कार्यरत आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या अफवांमुळे लसीकरणावरही परिणाम दिसून येत आहे.

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययाेजना केल्या जात आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापराबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काेराेनाकाळात सध्याच्या घडीला लस प्रभावी असून, लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहरात माेठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असताना ग्रामीण भागात मात्र लसीमुळे विविध आजार उद्‌भवतात, मृत्यू ओढवताे, लसीमुळेच ताप येऊन काेराेना हाेताे, बुरशीजन्य आजार (म्युकरमायकाेसिस) हाेत असल्याच्या अफवा पसरत आहेत. आराेग्य विभागातर्फे गावागावांत लसीकरण काेराेनावर उपाययोजना करून, जास्तीत जास्त नागरिकांनी करून घेण्याचे आवाहन केले जात असताना याकडे ग्रामीण भागातील नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

....................

काय आहेत अफवा

काेराेना संसर्ग हाेताेय

ग्रामीण भागात सर्वात जास्त काेणत्या अफवेला पेव फुटले असेल तर लस घेतल्यानंतरच काेराेना संसर्ग हाेताे. यामध्ये सर्वाधिक वृध्द लाेकांचा समावेश असल्याचे दिसून आले.

मृत्यू ओढावताेय

लस घेतल्यानंतर काही जणांनाच ताप येत असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात काेराेना लस घेतल्यानंतर ताप येताेच व त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हाेत असल्याची काही जण चर्चा करताना दिसून येत आहे.

बुरशीजन्य आजार उद्‌भवताे

लसीकरणामुळे बुरशीजन्य आजार उद्‌भवत असल्याची चर्चा ग्रामीण भागात हाेत आहे. मला काहीच झाले नाही, आणि हाेणार नाही असे सांगून काही ग्रामस्थ लसीकरण करून कशाला आजार गळ्यात घ्यायचे, अशी चर्चा करीत आहेत.

...............

गावकरी संभ्रमात

लस घेतल्यानंतर विविध आजार होत असल्याची चर्चा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. यामुळे गावकरीसुध्दा संभ्रमात दिसून येत आहेत. यासंदर्भात काही गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता यावर काेणीही बाेलायला तयार नाही. आम्ही लस घेतल्याचे सांगत आहेत. काही जण तर लसीकरणाबाबत काहीही बाेलण्याचे टाळत आहेत.

............

ग्रामीण भागात लसीकरणामुळे विविध आजार होत असल्याची चर्चा, अफवा पसरत असली तरी लसीकरणच काेराेनावर प्रभावी उपाय आहे. लसीकरणामुळे अनेक जणांचा काेराेनापासून बचाव झाला आहे. नाहक अफवा पसरविणे गुन्हा आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व इतरांना परावृत्त करणे म्हणजेच काेराेना संसर्ग राेखणे शक्य होेईल.

- डाॅ. मधुकर राठाेड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम