शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड बसस्थानकाचे ताळतंत्र बिघडले

By admin | Updated: May 12, 2014 23:21 IST

बसेस दररोज उशीरा सुटत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचा ताटकळत बसावे लागते

रिसोड: येथील आगारातून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या बसेस दररोज उशीरा सुटत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचा ताटकळत बसावे लागते.

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. सुरक्षेच्या दृष्ट्रिकोनातून सर्वच लोक दूरचा प्रवास राज्य परिवहन मंडळाच्या बसने करणे पसंत करतात परंतु ऐन महत्वाच्या कामासाठी निघालेल्या प्रवाशाची येथील बसस्थानकावर आल्यावर वेळेवर बस न मिळाल्याने चांगलीच तारांबळ उडते गेल्या कित्येक दिवसांपासून या आगारातून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या बसेस पैकी एकहीबस ही नियमित वेळेवर सुटली नसल्याची माहिती आहे. वाहतुक नियंत्रण कक्षात असलेल्या नोंद वहीतील नोंदीनी ही बाब अधोरेखित केली आहे. रिसोड आगाराची स्थापना २0 डिसेंबर १९८६ रोजी झाली यावेळी आगारात केवळ चौदा बसेस होत्या गत तीन दशकाच्या कालावधीत महामंडळाचा व्याप वाढला आहे. आजमितीस आगारात ४५ बसेस आहेत. त्यातून ४८ शेडयुल सुरु करण्यात आले आहेत यामध्ये लांब पल्ल्याचे २६ शेडयूल सुरु आहेत. उर्वरित जिल्हयाअंतर्गत डे आउट शेडयुल सुरु असतात यात आठवडयातील सुट्टीचा एक दिवस वगळून १0४ चालक व १00 वाहक कर्तव्य बजावत. पुरेशा प्रमाणात चालक आणि वाहक उपलब्ध असतानाही दरारेज लांब पल्ल्याच्या बसेस उशिरा जात असल्याच्या कारणावरून या पुर्वीच्या काळात विभाग नियंत्रकांनी रिसोड आगाराचे दोन शेडयुल बंद करुन इतर आगाराला हस्तांतरित केले होते. याच बरोबर चार बसेस कमी केल्या होत्या. शिवाय चार चालक चार वाहकांचीही बदली इतर ठिकाणी केली होती यावेळी स्थानिक माध्यमानी हा विषय एस.टी.महामंडळाच्या लक्षात आणून देत सत पाठपुरावा करत बंद शेडयुल, बसेस व बदली झालेले वाहक चालक पुर्ववत याच आगारातून सुरु करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती तरी सुद्धा रिसोड आगाराच्या कामकाजात तिळ मात्र फरक झाला असल्याचे जाणवत नाही. रिसोड आगार अकोला विभागातुन इतर आगाराच्या तुलनेत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे आगर म्हणून सर्वङ्म्रृत आहे. या परिस्थितीतही आगाराचे दैनंदिन उत्पन्न चार ते साडेचार लाखावर आहे प्रासंगीक कराराच्या दिवशी दिलेल्या बसेस मधुन एकूण आगाराचे उत्पन्न यापेक्षाही जास्त असल्याचे समजते ऐवडया मोठया उत्पन्नाच्या आगारावर प्रभारी आगार व्यवस्थापकांचे म्हणावे तेवढे लक्ष दिसून येत नाही योग्य नियोजन व कर्मचारी वर्गात समन्वय असल्यास आगाराचा कायापालट होवू शकतो परंतु, त्या करिता आगारातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये प्रामाणिकपणे स्वत:चे दैनंदिन कर्तव्य पार पाडण्याची दृढ इच्दा शक्ती असणे गरजेचे आहे आगारातील बसेस उशीरा सुटने ही बाब नित्याची झाल्याने बर्‍याच वेळा प्रवाशी व अधिकार्‍यानमध्ये वाद निर्माण होतात एकंदरीत यासर्व घडामोडीमध्ये आगारातील बसेस वेळेवर सुटत नसल्यानेच प्रवाशी खोळंबा व इतर गोष्टी घडतात सकाळी नउ वाजताची बस दुपारी दोन वाजता तर एकाच ठिकाणी जाणार्‍या दोन दोन बसेस एकाच वेळी सोडण्याचा अफलातून प्रकार आगारात पहावयास मिळतो. कित्येक वेळा दुपारी चार वाजताची अकोला गाडी साडेपाचच्या अकोला गाडी सोबत दोन्ही बस एकाच वेळी योग्य नियोजना अभावी पाठविल्या जातात केवळ आगारा किमी रद्द होवू नये या करिता एक गाडी रिकामी पाठविल्या जाते. या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात प्रभारी आगार व्यवस्थापक कमी पडत असल्यानेच रिसोड आगाराचे ताळतंत्र बिघडले आहे.