शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे!

By admin | Updated: April 4, 2017 00:01 IST

शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने जलसंधारणाची कामे होणार आहेत!

वाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध स्वरूपातील जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने या निधीतून राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ३ एप्रिल रोजी दिली.जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, रिचार्ज ट्रेन्च, मातीनाला बांध, समतल सलग चर यासह इतरही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदा होऊन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटावर बहुतांशी मात करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाकडून दोन वर्षांत वाशिम जिल्ह्याला मिळालेल्या ५५.४७ कोटी रुपयांच्या निधीतून मार्च २०१७ अखेर ७.१९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नव्हता. त्यामुळे तो परत जाण्याच्या मार्गावर होता. राज्यशासनाने मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यालाही हा निधी परत देण्याचा निर्णय जाहीर केल्याने या निधीतून अर्धवट अवस्थेत असलेली तद्वतच नव्याने हाती घेतल्या जाणारी जलसंधारणाची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.