शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

अखर्चित ७ कोटीच्या निधीतून होणार जलसंधारणाची कामे!

By admin | Updated: April 4, 2017 00:01 IST

शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने जलसंधारणाची कामे होणार आहेत!

वाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध स्वरूपातील जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून ५५ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ७ कोटी १९ लाखाचा निधी अखर्चित होता. तो शासनाने परत दिल्याने या निधीतून राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ३ एप्रिल रोजी दिली.जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, रिचार्ज ट्रेन्च, मातीनाला बांध, समतल सलग चर यासह इतरही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदा होऊन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटावर बहुतांशी मात करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाकडून दोन वर्षांत वाशिम जिल्ह्याला मिळालेल्या ५५.४७ कोटी रुपयांच्या निधीतून मार्च २०१७ अखेर ७.१९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नव्हता. त्यामुळे तो परत जाण्याच्या मार्गावर होता. राज्यशासनाने मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यालाही हा निधी परत देण्याचा निर्णय जाहीर केल्याने या निधीतून अर्धवट अवस्थेत असलेली तद्वतच नव्याने हाती घेतल्या जाणारी जलसंधारणाची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.