शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खासगी विनाअनुदानित शाळांचे २.४0 कोटी रुपये थकले!

By admin | Updated: April 19, 2016 02:28 IST

३६ जिल्ह्यांसाठी केवळ १0 कोटींचा निधी मंजूर; वाशिम जिल्ह्याला मिळणार तुटपूंजा निधी.

सुनील काकडे / वाशिमवंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 'आरटीआय अँक्ट'अंतर्गत प्रवेश देणार्‍या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे सुमारे २.४0 कोटी रुपये थकीत असताना शासनाने १६ एप्रिल रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी केवळ १0 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यापैकी वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला तुटपूंजा निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, संबंधित संस्थाचालकांसोबतच प्राथमिक शिक्षण विभागातही यामुळे चिंता व्यक्त होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश दिला जातो. त्यापोटी येणार्‍या खर्चाची प्रतिपूर्ती शासन करते. मात्र, जिल्ह्यातील सन २0१४-१५ मधील ५२ शैक्षणिक संस्थांचे ९0 लाख आणि २0१५-१६ मधील ८८ संस्थांचे १.५0 कोटी, असे एकंदरित २.४0 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २0१४-१५ मधील ५२ शैक्षणिक संस्थांमधील ७८३ विद्यार्थ्यांचा ८९ लाख रुपयाचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला; मात्र हा निधी अद्यापही मिळाला नाही. अशातच सन २0१५-१६ चे शैक्षणिक सत्र संपले असून, या सत्रात ८८ संस्थांनी सुमारे १२00 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यापोटी संबंधित शैक्षणिक संस्थांना जवळपास १.५0 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. असे असताना शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता उणापुरा १0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातून वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला तुटपूंजा निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.