शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या दरात २०० रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

जिल्ह्यात गत खरीप हंगामातील प्रत्येकच शेतमालास निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. तुरीचीही स्थिती कमीअधिक इतर ...

जिल्ह्यात गत खरीप हंगामातील प्रत्येकच शेतमालास निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. तुरीचीही स्थिती कमीअधिक इतर शेतमालाप्रमाणेच आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते; परंतु तूर निर्यात करणाऱ्या देशात आलेली अस्थिरता आणि देशांतर्गत तुरीचा साठा अत्यंत कमी उरल्याने राष्ट्रीयस्तरावर तुरीची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर चांगला झाला आणि सुरुवातीच्या काळात ५५०० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल असलेले तुरीचे दर थेट ७ हजारांच्या वर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि तुरीची आवकही वाढू लागली. अशातच गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला. त्यामुळे विविध व्यवहारांवर मर्यादा आल्याने तुरीच्या खरेदीवरही परिणाम झाला आणि दरात घसरण सुरू झाली. गेल्या चारच दिवसांपूर्वी ७ हजार रुपयांच्या वर पोहोचलेले तुरीचे दर २०० रुपयांनी घसरून ६८५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दर घसरले असतानाच कोरोना संसर्गामुळे बाजारातील शेतमालाच्या आवकीवर परिणाम झाला असून, तुरीची आवकही घटली आहे.

-------------------

दरात पुन्हा तेजी येणार

राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाल्याने शेतमालाच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. तथापि, पुढे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा नियंत्रित होऊन तुरीच्या दरात तेजी येण्याचा विश्वास व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, सद्य:स्थितीत मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे.

------------------

जिल्ह्यातील तुरीचे किमान व कमाल दर

वाशिम ६०५०-६८७०

रिसोड ६६४०-६८३०

मानोरा ६५५०-६८५०

मं.पीर ५५००-६६९०

मालेगाव ६२००-६७८०