शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

करपलेल्या पिकांवर ‘रोटावेटर’

By admin | Updated: July 13, 2015 02:10 IST

मंगरुळपीर तालुक्यात दुबार पेरणी.

मंगरूळपीर (जि. वाशिम) : गेल्या १५ ते २0 दिवासांपासून पावसाने दडी मारल्याने शेतामधील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथील शेतकरी भगवान वर्‍हाडे यांनी रविवारी (दि.१२) आपल्या शेतात ट्रॅक्टर टाकून ६ एकरातील सोयाबीन पीक रोटावेटरद्वारे उद्ध्वस्त केले. दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार, यात शंका नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुक्यातील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बीबरोबर खरीप हंगामावर निर्सगाचा प्रकोप कायम आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. जवळपास ९0 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणी नंतर काही दिवसात पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला. गेल्या १५ ते २0 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उभी पिके वाळू लागली आहे. आकाशाकडे पाहून-पाहून शेतकर्‍यांच्या डोळय़ात पाणी येत आहे; मात्र मेघ बरसेनात, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. चिखली झोलेबाबा येथील युवा शेतकरी भगवान वर्‍हाडे यांच्याकडे ६ एकर शेती आहे. दमदार पावसानंतर त्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर काही दिवसात पावसाने दडी मारल्यामुळे उभ्या पिकांनी माना टाकल्या. अशी परिस्थिती तालुक्यात सर्वत्रच आहे. जड अंत:करणाने वर्‍हाडे यांनी करपलेले सोयाबीन, ट्रॅक्टरच्या रोटावेटरद्वारे काढले आणि दुबार पेरणीसाठी जमिनीची मशागत करण्याला प्राधान्य दिले. आता दुबार पेरणीकरिता पुन्हा बी-बियाण्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मंगरुळपीर तालुक्यात सर्वत्र पिके सुकून चालली आहेत. पिके करपून जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय शेतकर्‍यांना अन्य पर्याय नाही. दुबार पेरणीच्या चिंतेने तालुक्यातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.