शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

धरण क्षेत्रातील रहदारीचे मार्ग बंद!

By admin | Updated: October 10, 2016 03:47 IST

सात ठिकाणी रस्ते व पुलांची कामे ठप्प; शेतमाल राहतोय शेतातच पडून.

सुनील काकडेवाशिम,दि.0९- जिल्हय़ातील सात सिंचन प्रकल्प क्षेत्रातील बुडित क्षेत्रामुळे बाधित होणारे रस्ते व पुलांची कामे गत अनेक वर्षांपासून रखडली आहेत. परिणामी, प्रकल्प परिसरातील रहदारीचे मार्ग बहुतांशी बंद झाले असून, पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना खरिपातील शेतमाल घरी आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत.गोंडेगाव लघू पाटबंधारे योजनेच्या कार्यक्षेत्रात उमरी-शेंदोणा रस्ता कामासाठी जलसंपदा विभागाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सन २0१२ मध्ये ६६ लाख रुपये रकमेचा भरणा केला. यासह काम पूर्ण करण्यासंदर्भात २0१२ ते २0१५ दरम्यान सात वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र अद्याप या कामास प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे ६६ लाख रुपयांचा निधी परत करण्याबाबत १७ फेब्रुवारी २0१५ रोजी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला; पण निधीदेखील अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गायवळ लघू पाटबंधारे संग्राहक योजना कार्यक्षेत्रात वाशिम-कारंजा राज्य मार्ग क्रमांक २0१७ किन्ही ५१/६00 या पुलाच्या अंदाजपत्रकाबाबत पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सलग पाठपुरावा केला. दरम्यान, ३0 डिसेंबर २0११ रोजी १३५.६0 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले; मात्र अंदाजपत्रकात नदीच्या विसर्गानुसार अपेक्षित गाळ्यांपेक्षा अधिक गाळे ठेवण्यात आल्यासंदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. २८ ऑक्टोबर २0१५ ला अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुलाच्या कामास मान्यता दर्शविण्यात आली; परंतु ३.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देऊन गाळ्यांची संख्या कमी करणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले. गायवळ प्रकल्पाला जून २0१५ मध्ये १२.0९ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात पुलासाठी १.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; मात्र ३.१२ कोटी रुपयांची किंमत घेतल्यास पुन्हा शासनाकडून ह्यसुप्रमाह्ण घ्यावी लागणार असल्याने हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही.स्वासीन लघू पाटबंधारे योजना कार्यकक्षेतील कवठळ ते कुपटा या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाटबंधारे विभागाने २३ जानेवारी २0१५ रोजी १६२.४३ लक्ष रुपयांचा भरणा केला; मात्र कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही. उकळी बॅरेज कार्यकक्षेतील राजगाव ते अनसिंग रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १.३७ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला. या कामास डिसेंबर २0१५ ला कार्यारंभ आदेश देऊन जून २0१६ पर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली; मात्र हे काम अद्याप प्रलंबित आहे. चाकातीर्थ लघू पाटबंधारे संग्राहक योजनेमुळे नागपूर ते औरंगाबाद राज्य मार्गावरील सबर्मसिबल पूल बाधित होत आहे. बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढविल्यास चाकातीर्थ धरणात पूर्ण साठा करणे शक्य होईल. पर्यायाने मालेगावला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असे जलसंपदाने शासनाला कळविले आहे. वारा लघू पाटबंधारे योजनेच्या बुडित क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८९ वरील जांभरुण ते बोरी बु. या रस्त्यावरील पुलाची उंची वाढविणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदाने १.१७ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला; मात्र अद्याप या कामाला प्रारंभ झालेला नाही. रस्ते, पुलाअभावी शेतमाल अडकला शेतात!पाटबंधारे विभाग क्रमांक तीनच्या अधिपत्याखाली झालेल्या वारा जहागीर बृहत लघू पाटबंधारे सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली देपूळ ते बोरी रस्त्यावरील पूल पाच फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे बोरी ते देपूळ गावचा संपर्क तुटला असून, या रस्त्यावर शेती असणार्‍या २५0 शेतकर्‍यांच्या १ हजार ५00 एकर शेतातील सोयाबीन पीक शेतात ठेवण्याची वेळ आली आहे.