शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

आरओ प्लांट बंद; नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

संतोष वानखडे वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध ...

संतोष वानखडे

वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, सद्यस्थितीत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमधील आरओ प्लांट बंद असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार तसेच साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्ह्यातील ४९१ पैकी जवळपास ३०० च्यावर ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीतून आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, अल्पावधीतच अनेक आरओ प्लांट बंद पडले. बंद पडलेले आरओ प्लांट काही ग्रामपंचायतींनी सुरू केले तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित करून बंद असलेले आरओ प्लांट त्वरित सुरू करण्याकडे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर बंद पडलेले आरओ प्लांट तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. देसाई यांनी दिले. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीदेखील आढावा घेत आरओ प्लांट सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. तथापि, ग्रामपंचायतींनी बंद पडलेले आरओ प्लांट सुरू करण्याकडे अद्यापही दुर्लक्षच चालविले असल्याचे दिसून येते. आरओ प्लांट बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्याने तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

०००००००००००

नागरिकांच्या तक्रारींची दखल केव्हा घेणार?

ग्रामपंचायतींनी सुरू केलेले काही आरओ प्लांट बंद पडल्यासंदर्भात नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटणी, पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रारी केल्या. जिल्ह्यातील काही गावात बंद असलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ प्लांट त्वरित दुरुस्त करून ग्रामस्थांना तेथून पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी १५ ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र, अद्यापही काही गावात आरओ प्लांट सुरू न झाल्याने तक्रारींची दखल केव्हा घेणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

००००००००००००००००००

दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर?

पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. सध्या तापाने जिल्हा फणफणत असून, दूषित पाण्यामुळे यामध्ये आणखीच भर पडण्याची चिन्हे आहेत. दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर याला ग्रामपंचायतींचे दिरंगाईचे धोरणच कारणीभूत राहील, असा इशाराही गावक-यांनी दिला.

००००००००००००००००

कोट बॉक्स

१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. काही ठिकाणी आरओ प्लांटमध्ये बिघाड झाल्याने बंद पडल्याबाबत तक्रारी होत्या. बंद पडलेले आरओ प्लांट दुरुस्त करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आढावा घेतला असून, संबंधितांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी.

- डॉ. श्याम गाभणे

अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम