शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

By admin | Updated: December 19, 2014 01:17 IST

ढगाळ वातावरणाने पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम : ढगाळ वातावरण व धुके यामुळे वातावरणात आद्र्रता तयार होते. यामुळे पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच धुक्यामुळे वातावरणातील विषारी रसायन पिकांवर पडून पिकांची शेंडे करपणे, फुले, कोवळी फळे व शेंगा गळून पडू शकतात. यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. यासंदर्भात कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतिने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.गत काही दिवसांपासून थंडी मोठय़ा प्रमाणात पडत आहे. या थंडीचा तूर पिकाला चांगला फायदा होऊ शकतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे; परंतु ढगाळ वातावरण व धुक्यामुळे तुरीसह इतरही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवते. दोन दिवसांपूर्वी वातावरणात बदल होऊन धुके पडल्याने रब्बीतील हरभरा, तूर, पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.तूर पिकांवर शेंगा धरल्यावर व्यवस्था असल्यास पाणी देणे आवश्यक आहे. यासह बड वेव्हिल,, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी,, शेंगेवरील ढेकूण, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशीची अळी या किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन किडीच्या नियंत्रणाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाबाबतही याच पध्दतीेने काळजी घेणे गरजेचे आहे. गत चार ते पाच दिवसांपासून थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गळ्याचा त्रास मोठया प्रमाणात दिसून येत आहे.