शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

दहावीच्या निकालातही रिसोडची बाजी

By admin | Updated: June 14, 2017 02:38 IST

रिसोड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल ९०.०० टक्के लागला.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल ९०.०० टक्के लागला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१७ चा निकाल मंगळवारी आॅनलाइन घोषित करण्यात आला. तालुक्यातील २ शाळांचा निकाल १०० टक्के आहे.तालुक्यामध्ये ५९ माध्यमिक शाळा असून, परीक्षा २०१७ साठी ४३१७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत प्रवीण्य क्षेणीमध्ये ९१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये १,६८४ व द्वितीय क्षेणीमध्ये १,१५७ विद्यार्थिनी यश मिळविले आहे. यावर्षी १०० टक्के शाळांचा निकालामध्ये घसरण झाली असून, केवळ २ शाळांचा पात्र ठरल्या आहे यामध्ये रिसोड येथील राजस्थान माध्यमिक विद्यालय व रहेमानिया उर्दू शाळा वाघी खुर्द या शाळांचा समावेश आहे सिद्धेश्वर विद्यालय रिसोडचा निकाल सर्वात कमी लागला आहे तालुक्यातील ५९ शाळेचा निकाल हा ५० टक्के च्यावरच लागला आहे .तालुक्यातील शाळामध्ये भारत माध्यमिक शाळा रिसोड ९१.१२, भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड ८६ टक्के, शिवाजी हायस्कूल रिसोड ८७.४४ टक्के, महात्मा फुले विद्यालय रिसोड ६६.६६ , डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय रिसोड ७८.५७ टक्के, शिवाजी विद्यालय मोप ९१.८० टक्के, शिवाजी हायस्कूल भरजहागीर ९७.८७ टक्के, शिवाजी हायस्कूल वाकद ९२.३०, ज्ञानेश्वरी विद्यालय मांडवा ९४.११ टक्के, शिवाजी हायस्कूल रिठद ७४.४७ टक्के शिवाजी हायस्कूल येवता ८५.३६ टक्के, पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली ९५.४९ टक्के, भारत माध्यमिक शाळा चिचांबाभर ९८.३८ टक्के, शिवाजी हायस्कूल गोभणी ९५.६५ टक्के, ज्ञानेश्वर विद्यालय करडा ९४.५९ टक्के, सखाराम महाराज विद्यालय लोणी ९०.९० टक्के, रेणुकामाता विद्यालय गोवर्धन ९८.५८ टक्के, शिवाजी विद्यालय केनवड ९५.६३ टक्के, शिवाजी हायस्कूल कोयाळी ८४.९५ टक्के, प्रियदर्शनी विद्यालय आसेगाव पेन ९०.९७ टक्के, महात्मा गांधी विद्यालय लेहणी ९२.७७ टक्के, सरस्वतीबाई मानधने विद्यालय एकालासपूर ८४.३७ टक्के, रामरावजी झनक विद्यालय नेतन्सा ९०.१९ टक्के, रामरावजी झनक विद्यालय महागाव ८५.९१ टक्के, शिवाजी हायस्कूल हराळ ९४.७८ टक्के, विवेकानंद विद्यालय व्याड ९८.६४ टक्के, सिद्धेश्वर विद्यालय सवड ८२.९७ टक्के, बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशव नगर ८१.६६ टक्के, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येवती ८९ टक्के, संभाजीराव देशमुख विद्यालय लिंगापेन ८८.२३, भारत माध्यमिक शाळा चिंचाबापेन ९६.२२, अशी शाळांच्या निकालाची टक्केवारी ठरली आहे. १८ शाळांची टक्केवारी ९० च्या वररिसोड तालुक्यातील केवळ दोन शाळांना यंदा शंभर टक्के निकाल लावणे शक्य झाले. वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोराच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी, तालुक्यातील एकूण ५९ शाळांपैकी १८ शाळांनी यंदाच्या निकालांत ९० टक्क्यांच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण करण्यात यश मिळविले. ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे. रिसोडचा शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत असल्याचे यंदाच्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळेच्या वार्षिक परीक्षेतील निकालावरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यामध्ये ३२ उच्च माध्यमिक शाळा आहेत. ३० मे रोजी जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या निकालात या सर्व शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ४२८४ विद्यार्थ्यांपैकी त्यापैकी ४०३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ही टक्केवारी ९४.१९ टक्के होती. त्यावेळीही रिसोड तालुका जिल्ह्यात आघाडीवर राहिला होता आणि मंगळवारी जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालातही या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून तालुक्याचा नावलौकिक कायम ठेवला आहे.