विवेकानंद ठाकरे / रिसोड : जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानंतर सक्रिय होत तहसीलच्या पथकाने गौण खनिजप्रकरणी जवळपास २५ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. रिसोड तालुक्यातील स्वामित्वधनाची मालमत्ता जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल प्रशासनाची असताना रेती व इतर गौण खनिजाची चोरी सर्रासपणे सुरू आहे. यावर अंकुश ठेवण्याचे कडक आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. यानंतर महसूल प्रशासन झोपेतून जागे होऊन पाच महिन्यांत रेती चोरीचा एकूण २५ लाख रुपये दंड वसूल करून १३८ प्रकरणांची नोंद घेण्यात आली. आर्थिक वर्ष २0१५-१६ मध्ये प्रारंभी दंडवसुली संथगतीने सुरू होती, ही बाब वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आल्याने संबंधित विभागांवर कडक ताशेरे ओढण्यात आले. गौण खनिजाची चोरी कोट्यवधीच्या घरात आणि दंड व सुली नगन्य असा प्रकार सर्रासपणे सुरू होता. यामध्ये ह्यअर्थह्णपूर्ण उद्देश दडला होता, ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचली आणि संबंधितांना कडक निर्देश देण्यात आले. यामुळे तालुका प्रशासनाने झोपेतून जागे होत कारवाईचा सपाटा सुरू केला आणि जानेवारी महिन्यात १३ लाख ६६ हजार ४00 रुपयांचा दंड वसूल केला, तर मालमत्ता दिवसामध्ये १ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आकडा पूर्ण केला. संथगतीने चालणारी प्रक्रिया अचानक गतिमान कशी बनली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरवर्षी स्वामित्वधनाची चोरी किती झाली, याचा आकडा मात्र मिळणे कठीण आहे. त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडले जाते, हे पाहणे आवश्यक आहे. या रेतीघाट प्रकरणात प्रारंभी तीन तलाठय़ांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अद्यापही खरे सूत्रधार हाती लागले नाहीत. स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात ह्यअर्थह्णपूर्ण घडामोडी घडत असतानाही तालुका प्रशासन यापासून अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला. मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणात गौण खनिज रिसोड तालुक्यात येत आहे.
गौण खनिजातून २५ लाखांचा महसूल
By admin | Updated: February 15, 2016 02:13 IST