शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गौण खनिजातून २५ लाखांचा महसूल

By admin | Updated: February 15, 2016 02:13 IST

मराठवाड्यातील गौण खनिजाची रिसोडात अवैध विक्री.

विवेकानंद ठाकरे / रिसोड : जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानंतर सक्रिय होत तहसीलच्या पथकाने गौण खनिजप्रकरणी जवळपास २५ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. रिसोड तालुक्यातील स्वामित्वधनाची मालमत्ता जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल प्रशासनाची असताना रेती व इतर गौण खनिजाची चोरी सर्रासपणे सुरू आहे. यावर अंकुश ठेवण्याचे कडक आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. यानंतर महसूल प्रशासन झोपेतून जागे होऊन पाच महिन्यांत रेती चोरीचा एकूण २५ लाख रुपये दंड वसूल करून १३८ प्रकरणांची नोंद घेण्यात आली. आर्थिक वर्ष २0१५-१६ मध्ये प्रारंभी दंडवसुली संथगतीने सुरू होती, ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आल्याने संबंधित विभागांवर कडक ताशेरे ओढण्यात आले. गौण खनिजाची चोरी कोट्यवधीच्या घरात आणि दंड व सुली नगन्य असा प्रकार सर्रासपणे सुरू होता. यामध्ये ह्यअर्थह्णपूर्ण उद्देश दडला होता, ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचली आणि संबंधितांना कडक निर्देश देण्यात आले. यामुळे तालुका प्रशासनाने झोपेतून जागे होत कारवाईचा सपाटा सुरू केला आणि जानेवारी महिन्यात १३ लाख ६६ हजार ४00 रुपयांचा दंड वसूल केला, तर मालमत्ता दिवसामध्ये १ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आकडा पूर्ण केला. संथगतीने चालणारी प्रक्रिया अचानक गतिमान कशी बनली, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरवर्षी स्वामित्वधनाची चोरी किती झाली, याचा आकडा मात्र मिळणे कठीण आहे. त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडले जाते, हे पाहणे आवश्यक आहे. या रेतीघाट प्रकरणात प्रारंभी तीन तलाठय़ांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अद्यापही खरे सूत्रधार हाती लागले नाहीत. स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात ह्यअर्थह्णपूर्ण घडामोडी घडत असतानाही तालुका प्रशासन यापासून अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला. मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणात गौण खनिज रिसोड तालुक्यात येत आहे.