शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पुनरागमन; पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

गेले १७ दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी रात्री जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी ...

गेले १७ दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी रात्री जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकानादेखील संजीवनी मिळाली आहे. जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली. त्यामुळे खरिपाची पेरणीही ९८ टक्के पूर्ण झाली; परंतु जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने दडी मारली. त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिके संकटात सापडली काही शेतकऱ्यांनी, तर पिके सावरण्याची शक्यताच नसल्याने उभ्या पिकांवर नांगर फिरवून दुबार पेरणीची तयारीही केली. काही शेतकरी सिंचनाच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करतानाही दिसले. कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी मात्र शेतकरी आकाशाकडे टक लावून पाहत होते. अखेर बुधवारी रात्री आणि गुरुवारी पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिकांना दिलासा मिळाला. मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक राहिले, तर वाशिम, मानोरा तालुक्यातही पिकांना आधार देणारा पाऊस पडला.

----------------------

कारंजा, मालेगावची स्थिती बिकट

जिल्ह्यात १७ दिवसांनी पावसाचे पुनगरामन झाले. त्यात बुधवारी रात्री मंगरूळपीर तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली, तर वाशिम तालुक्यात ६.५ आणि मानोरा तालुक्यात ४.२ असा पिकांना जेमतेम आधार देणारा पाऊस पडला; परंतु कारंजा आणि मालेगाव तालुक्यात मात्र पावसाचा अद्यापही पत्ताच नाही. बुधवारी रात्री मालेगाव तालुक्यात १.७ मि.मी. तर कारंजा तालुक्यात केवळ ०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

------------

मंगरूळपीरमध्ये २० मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नव्हता; परंतु सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे चांगला आधार मिळाला. जिल्ह्यात बुधवार ७ जुलै रोजीच्या २४ तासात सरासरी ७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरूळपीर तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. या तालुक्यात उपरोक्त २४ तासातच २० मि.मी. पावसाची नोंद झाली.

-------------------

नदी, नाले तहानेलेलेच

जिल्ह्यात यंदा ८ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या ३१.५ टक्के आणि मासिक सरासरीच्या १०८.३ टक्के पाऊस पडला असला तरी जिल्ह्यातील नद्या, नाल्यांचे पात्र कोरडेच असल्याचे दिसत आहे. एरव्ही जुलै महिन्यात खळखळ वाहणारे बहुतांश नाले आणि मुख्य नद्यांचे पात्रही सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्याने कोरडेच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.