शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिका-यास तीन वर्षाचा सश्रम कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:41 IST

मालेगाव येथील ग्राम पंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.क़े.गौर यांनी ५ सप्टेंबर रोजी सुनावली.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाललाचलुचपतचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव येथील ग्राम पंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.क़े.गौर यांनी ५ सप्टेंबर रोजी सुनावली.फिर्यादी रामकिशोर जैस्वाल, रा.मालेगाव या तत्कालीन अपात्र सरपंचाने ६ फेबु्रवारी २००२ रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद दिली होती. रामकिशोर जैस्वाल यांनी मालेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य अपात्र करण्याकरिता तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणी तत्कालीन ग्रा.पं.सदस्य संजय आनंदा गर्जे, राजु गणपत काटे, शोभा नारायण खिल्लारे व रामचंद्र संपत बळी या चार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचीका तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडे दाखल केली होती. या चार सदस्यांना अपात्र केल्यानंतर सरपंच पदावरुन अपात्र झालेले रामकिशोर जैस्वाल यांची पुन्हा सरपंचपदी नियुक्ती होवुन त्यांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे जैस्वाल यांनी सदर प्रकरणात राठोड यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन व विचारणा करुन निकाल देण्याबाबत प्रयत्न केले. यामुळे ५ फेबु्रवारी २००२ ला आरोपी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बलदेव राठोड यांनी याचिका निकाली काढण्यासाठी जैस्वाल यांच्याकडे २५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. यापैकी ५ हजार रुपये ६ फेबु्रवारी २००२ ला द्यावे व उर्वरीत रक्कम निकाल लागल्यानंतर द्यावी, असे म्हटले. यावरुन जैस्वाल यांनी त्याचदिवशी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ फेबु्रवारी २००२ ला सापळा रचुन तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी ५ हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३,(१) (ड) व १३, (२) (ड) अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणी न्यायालयाने तीन साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यावरुन गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी राठोड हे दोषी आढळुन आल्याने न्यायाधीश गौर यांनी कलम ७ मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न  भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास; तर कलम १३ (१) (ड) व १३ (२) (ड) मध्ये तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर दोन्ही शिक्षा  आरोपीस एकत्र भोगावयाच्या आहेत. सदर प्रकरणात सरकारतर्फे  सरकारी वकील अ‍ॅड. अभिजीत व्यवहारे यांनी बाजू मांडली