शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

विषारी फवारणीमुळे शेतजमीन व पिकांवर परिणाम

By admin | Updated: January 20, 2015 00:40 IST

सेंद्रिय शेतीचा वापर कमी प्रमाणात: पिके घेण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक.

वाशिम : पिकांवरील रोगराईचा नाश व्हावा, याकरिता विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. या विषारी कीटकनाशकांमुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असला तरी शेतकर्‍यांकडे याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्‍यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून आले. काही शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल; मात्न या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेतीच धोक्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न देणार्‍या बियाणांची मागणी वाढत गेल्याने बीज उत्पादन कंपन्यात चढाओढ निर्माण झाली आहे. नवनवीन वाण बाजारात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची फवारणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतात उत्पादित होत असलेले भाजीपाला, फळे विषाक्त होत आहे. पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी धोक्याचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी संशोघन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले. विदेशात विषारी कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धान्यांचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रिय शेती उत्तम असल्याने याचा प्रचार व प्रसार केल्या जात आहे; मात्र अनेक शेतकरी याचा वापरही करीत नाहीत. कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतीने प्राप्त माहितीनुसार शक्यतोवर विषारी कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात यावी. आवश्यक असल्यास कमी विषारी असलेल्या फवारण्या कराव्यात. तसेच एकच एक पीक न घेता पिकात बदल केल्यास शेतजमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जिल्हय़ात सोयाबीननंतर हरभरा हेच पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते, हेच आलटून पालटून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेतल्यास कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शेतकर्‍यांना याचा अवलंब करणे गरजेचे आहे.