शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी फवारणीमुळे शेतजमीन व पिकांवर परिणाम

By admin | Updated: January 20, 2015 00:40 IST

सेंद्रिय शेतीचा वापर कमी प्रमाणात: पिके घेण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक.

वाशिम : पिकांवरील रोगराईचा नाश व्हावा, याकरिता विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. या विषारी कीटकनाशकांमुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असला तरी शेतकर्‍यांकडे याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्‍यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून आले. काही शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल; मात्न या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेतीच धोक्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न देणार्‍या बियाणांची मागणी वाढत गेल्याने बीज उत्पादन कंपन्यात चढाओढ निर्माण झाली आहे. नवनवीन वाण बाजारात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची फवारणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतात उत्पादित होत असलेले भाजीपाला, फळे विषाक्त होत आहे. पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी धोक्याचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी संशोघन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले. विदेशात विषारी कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धान्यांचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रिय शेती उत्तम असल्याने याचा प्रचार व प्रसार केल्या जात आहे; मात्र अनेक शेतकरी याचा वापरही करीत नाहीत. कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतीने प्राप्त माहितीनुसार शक्यतोवर विषारी कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात यावी. आवश्यक असल्यास कमी विषारी असलेल्या फवारण्या कराव्यात. तसेच एकच एक पीक न घेता पिकात बदल केल्यास शेतजमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जिल्हय़ात सोयाबीननंतर हरभरा हेच पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते, हेच आलटून पालटून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेतल्यास कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शेतकर्‍यांना याचा अवलंब करणे गरजेचे आहे.