शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

विषारी फवारणीमुळे शेतजमीन व पिकांवर परिणाम

By admin | Updated: January 20, 2015 00:40 IST

सेंद्रिय शेतीचा वापर कमी प्रमाणात: पिके घेण्याच्या पद्धतीत बदल आवश्यक.

वाशिम : पिकांवरील रोगराईचा नाश व्हावा, याकरिता विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे जिल्हय़ात चित्र आहे. या विषारी कीटकनाशकांमुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असला तरी शेतकर्‍यांकडे याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्‍यांशी केलेल्या चर्चेवरून दिसून आले. काही शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल; मात्न या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेतीच धोक्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न देणार्‍या बियाणांची मागणी वाढत गेल्याने बीज उत्पादन कंपन्यात चढाओढ निर्माण झाली आहे. नवनवीन वाण बाजारात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची फवारणी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतात उत्पादित होत असलेले भाजीपाला, फळे विषाक्त होत आहे. पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी धोक्याचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, कृषी संशोघन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले. विदेशात विषारी कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धान्यांचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रिय शेती उत्तम असल्याने याचा प्रचार व प्रसार केल्या जात आहे; मात्र अनेक शेतकरी याचा वापरही करीत नाहीत. कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतीने प्राप्त माहितीनुसार शक्यतोवर विषारी कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात यावी. आवश्यक असल्यास कमी विषारी असलेल्या फवारण्या कराव्यात. तसेच एकच एक पीक न घेता पिकात बदल केल्यास शेतजमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. जिल्हय़ात सोयाबीननंतर हरभरा हेच पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते, हेच आलटून पालटून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेतल्यास कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शेतकर्‍यांना याचा अवलंब करणे गरजेचे आहे.