शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

घरकुल योजनेला रेतीघाटांचा लगाम

By admin | Updated: November 25, 2015 02:20 IST

शासनाच्या शौचालय बांधकामातही अडथळा.

संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला शौचालय बांधकामात, रखडलेल्या रेतीघाट लिलावाचा मोठा अडसर ठरत आहे. यामुळे अनेक घरकुल आणि शौचालय बांधकामाचे बांधकाम ठप्प असून, उद्दिष्टपूर्तीसाठी लाभार्थ्यांंना नाइलाजास्तव अवैध रेती वाहतुकीकडे वळावे लागत आहे.हगणदरीमुक्तीबरोबरच स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्हय़ात २५ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. ९ ऑगस्ट २0१५ पासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, नेमके रेतीघाटाचा रखडलेला लिलाव ह्यगतिरोधकह्ण निर्माण करीत आहे. कारंजा तालुक्यात १४ हजार ३४७ घरकुलांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत १५00 घरकुलांचे काम पूर्ण झाले. जिल्हय़ात २0१५-१६ या वर्षात ऑक्टोबरअखेर पाच हजार शौचालयांचे बांधकाम झाले; मात्र रेतीघाट बंद असल्याने रेती आली कुठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. अवैध मार्गाने रेती चोरून आणलेल्या काही लाभार्थ्यांंना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.*शासनाच्याच दोन विभागात असमन्वयमहसूल व गौण खनिज विभागाच्या नियमानुसार शक्यतोवर नोव्हेंबर महिन्यात रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शौचालय व घरकुल बांधकाम मोहिमेला तोपर्यंंत सुरुवातही झालेली असते. रेतीघाटाचे लिलाव बंद असतानाही, दुसरीकडे मात्र शौचालय व घरकुलांचे बांधकाम सुरू असते.