शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निधी देण्याचा ठराव

By admin | Updated: February 8, 2016 02:28 IST

वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापतींचा पुढाकार घेऊन वाहने नाकारली.

संतोष वानखडे / वाशिम: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मृत्यूला कवटाळणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणारी सहा वाहने नाकारून सदर निधी २0१५-१६ मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना समप्रमाणात देण्याचा ठराव सहा सभापतींनी पारित केला. गत तीन-चार वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले. २0१५-१६ या वर्षात परिस्थिती अधिकच भयावह झाली. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता लांडगे नामक युवा शेतकर्‍याने पाणी असूनही सिंचनाची सुविधा उपलब्ध होत नसल्याची व्यथा मांडून मृत्यूला कवटाळले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून लांडगे यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांची चिरफाड केली होती. यादरम्यान जऊळका रेल्वेत सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधींचा ताफा दाखल झाला. शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर मंथन झाले आणि दोन महिन्यानंतर बहुतांश मंडळीला शेतकरी समस्यांचा विसर पडला असावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २0१५-१६ या वर्षात जिल्ह्यात ६00 हून अधिक शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. यामधील बहुतांश आत्महत्या शासनाच्या जाचक अटींमुळे मदतीस अपात्र ठरल्या, तर पात्र ठरलेल्या आत्महत्यांबाबत मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबातील वारसांना शासनाकडून मदत मिळाली. काही स्वयंसेवी संघटना, शिक्षण संस्थांनी सामाजिक बांधीलकी जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिला. अशीच सामाजिक बांधीलकी जोपासून जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर पंचायत समितीचे सभापती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सहा सभापतींना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जवळपास ४0 लाख किमतीची सहा वाहने मंजूर झालेली आहेत; मात्र या वाहनांऐवजी हा निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना समप्रमाणात देण्यावर सभापतींमध्ये मंथन झाले. वाशिमचे सभापती वीरेंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला.