शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज पुनर्गठित थकबाकीदार संभ्रमात!

By admin | Updated: July 8, 2017 01:49 IST

कर्जमाफीबाबत शेतकरी गोंधळात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतरही, पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीच्या कक्षेत घेतले जात नसल्याची धक्कादायक बाब वाशिम जिल्ह्यातून समोर येत आहे. जून २०१६ पूर्वी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेत असल्याचे निर्णयात नमूद आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा लेखाजोखा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप या कार्यवाहीला सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुनर्गठन केलेल्या; परंतु थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेची कर्जमाफी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. पुनर्गठन केलेले; परंतु थकबाकीदार असलेले शेतकरी यासंदर्भात बँकांशी संपर्क साधत आहेत. मात्र, वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नसल्याने तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. यासंदर्भात बँकांनादेखील योग्य त्या सूचना केल्या जातील.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था वाशिम