शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

स्वस्त धान्य दुकानांतील गहू वितरणात कपात!

By admin | Updated: May 3, 2017 01:52 IST

तांदळाचा साठा वाढल्याचा परिणाम : अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांची होणार गैरसोय

वाशिम : पुरवठा विभागाकडील तांदळाचा साठा अचानक वाढल्याने स्वस्त धान्य दुकानांमधून होणाऱ्या गहू वितरणात कपात करून त्याऐवजी लाभार्थींना तांदूळ दिला जात आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना बसला असून, त्यांना आपली गरज भागविण्याकरिता खुल्या बाजारातून अधिक दराने गहू विकत घ्यावा लागत आहे.जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी जवळपास दीड लाख कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखरसह आवश्यक वेळी इतर धान्य आणि तेलाचा रास्त दराने पुरवठा केला जातो. शहरी भागात ५९ हजार; तर ग्रामीण भागात ४० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या किंवा शेतमजूर केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. संबंधितांना महिन्याला मानसी ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे वितरण केले जाते; परंतु दोन महिन्यांपासून या प्रमाणात बदल करून संबंधित कुटुंबांना मानसी २ किलो गहू आणि ३ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत आहे; तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थींसाठी प्रति कुटूंब २० किलो गहू आणि १५ किलो तांदळाचे वितरण केले जात होते. त्यातही बदल करून आता संबंधित कुटुंबांना १९ किलो गहू आणि १६ किलो तांदूळ, या प्रमाणात वितरण सुरू करण्यात आले आहे. पुरवठा विभागाकडे तांदळाचा साठा अधिक झाला असल्याने वितरणाच्या प्रमाणात हा बदल करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात रोजच्या जेवणासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांत किं वा धान्यांत गहू आवश्यक असतो. भात हा पदार्थ चवीसाठी अथवा आवडीनुसार जेवनात ठेवला जातो. त्यामुळे आता तांदळाचे प्रमाण वाढवून गहू वितरण कमी झाल्याने महिन्यातील पंधरा दिवस स्वस्त धान्यावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना बाजारातून गहू विकत घ्यावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांत २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदळाचे वितरण होते. त्यामुळे फारशी गरज नसलेल्या धान्यावर नाहक खर्च करावा लागत आहेच. शिवाय आवश्यक धान्याचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिकाधारक कुटुंबाला जवळपास १० पट अधिक भाव असलेला गहू विकत घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.स्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्नवाशिम जिल्ह्यात साधारणत: भात खाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शिधापत्रिकांवर तांदळाचे वितरण वाढविल्याने अनेक कुटुंबांना अडचणी जाणवत असल्याचे पुरवठा विभागाच्याही लक्षात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन लाभार्थींच्या सोयीसाठी तांदूळ वितरणाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढविण्यासाठी तहसील स्तरावरून जनतेच्या मागणीनुसार अहवाल मागविण्याचा विचार जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर गव्हाचे वितरण वाढविण्यासाठी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गहू वितरणाचे प्रमाण पूर्ववत झाले, तर जिल्ह्यातील एक लाख केशरी आणि ६२ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक मिळून दीड लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबांना जाणवणारी मोठी समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात केशरी किं वा प्राधान्य असलेल्या शिधापत्रिकांवरील गहू वितरणाचे मानसी प्रमाण एक किलोने कमी करून तांदूळ वितरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तांदळाचा साठा वाढल्याने हा निर्णय तात्पुरत्या काळासाठी घेतला आहे. हा निर्णय इतरही जिल्ह्यात आहे. तथापि, जनतेच्या सोयीसाठी गव्हाचा पुरवठा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची बाब विचाराधिन आहे. - अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम