शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

विद्युत सहाय्यकांची भरती आता सरासरी गुणांच्या आधारे

By admin | Updated: October 27, 2014 00:00 IST

‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धत बंद, टक्केवारी २ नोव्हेंबरपूर्वी नोंदविण्याचे आवाहन.

अकोला: महावितरणने सुमारे ६५00 विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया एसएससीच्या बेस्ट ऑफ फाईव्हऐवजी एकूण सरासरी गुणांच्या आधारे राबविण्याचे ठरविले आहे.औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कंपनीने ही भरती प्रक्रिया एकूण सरासरी गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. पूर्वी दहावीत असलेल्या सहा विषयांची ७५0 गुणांपैकी परीक्षेतील टक्केवारी काढण्यात येत होती. मात्र, दहावीच्या अभ्यासक्रमात व परीक्षेत बदल झाला. आता बेस्ट ऑफ फाईव्ह ही नवीन पद्धत आली असून, यामध्ये जास्त गुण असलेल्या पाच विषयांचे मिळून दहावीची टक्केवारी काढण्यात येते. त्यामुळे आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त असते तर पूर्वी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी असते. बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत जुनी दहावी झालेल्यांच्या दृष्टीने योग्य नसल्याची भूमिका घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली होती. यावर खंडपीठाने बेस्ट ऑफ फाईव्हच्या टक्केवारीनुसार नियुक्ती करू नका, असा निर्णय दिला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने महावितरणने एकूण सरासरी गुणांच्या आधारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आपल्या एकूण सरासरी गुणांची टक्केवारी महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे दिलेल्या प्रणालीवर नोंदवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. याकरिता महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार त्यांच्या ऑनलाईन अर्जाचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड देऊन सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामधील सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण व एकूण गुण यामध्ये योग्य तो बदल करू शकता. हा बदल करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान संबंधित लिंक संकेतस्थळावर उपलब्ध राहील. त्यानंतर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.