शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विद्युत सहाय्यकांची भरती आता सरासरी गुणांच्या आधारे

By admin | Updated: October 27, 2014 00:00 IST

‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धत बंद, टक्केवारी २ नोव्हेंबरपूर्वी नोंदविण्याचे आवाहन.

अकोला: महावितरणने सुमारे ६५00 विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया एसएससीच्या बेस्ट ऑफ फाईव्हऐवजी एकूण सरासरी गुणांच्या आधारे राबविण्याचे ठरविले आहे.औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कंपनीने ही भरती प्रक्रिया एकूण सरासरी गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. पूर्वी दहावीत असलेल्या सहा विषयांची ७५0 गुणांपैकी परीक्षेतील टक्केवारी काढण्यात येत होती. मात्र, दहावीच्या अभ्यासक्रमात व परीक्षेत बदल झाला. आता बेस्ट ऑफ फाईव्ह ही नवीन पद्धत आली असून, यामध्ये जास्त गुण असलेल्या पाच विषयांचे मिळून दहावीची टक्केवारी काढण्यात येते. त्यामुळे आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त असते तर पूर्वी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी असते. बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत जुनी दहावी झालेल्यांच्या दृष्टीने योग्य नसल्याची भूमिका घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली होती. यावर खंडपीठाने बेस्ट ऑफ फाईव्हच्या टक्केवारीनुसार नियुक्ती करू नका, असा निर्णय दिला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने महावितरणने एकूण सरासरी गुणांच्या आधारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आपल्या एकूण सरासरी गुणांची टक्केवारी महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे दिलेल्या प्रणालीवर नोंदवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. याकरिता महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार त्यांच्या ऑनलाईन अर्जाचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड देऊन सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामधील सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण व एकूण गुण यामध्ये योग्य तो बदल करू शकता. हा बदल करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान संबंधित लिंक संकेतस्थळावर उपलब्ध राहील. त्यानंतर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.