शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी १०२ अर्ज प्राप्त

By admin | Updated: April 6, 2017 02:02 IST

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५ एप्रिलपासून योजनेचे छापील अर्ज वितरित करण्यासाठी नगर परिषदेमध्ये केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुसार, ५ एप्रिलपासून योजनेचे छापील अर्ज वितरित करण्यासाठी नगर परिषदेमध्ये केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी १०२ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेट्टे, नगर अभियंता विनय देशमुख यांनी बुधवारी दिली.केंद्र शासनामार्फत २५ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घरे (नागरी) योजना अमलात आली. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यातील ५१ शहरांमध्ये वाशिम शहराचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. यासाठी काही ठिकाणी आॅनलाइन अर्जसुद्धा भरण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी केवळ २५ रुपये खर्च येत असताना काही लोकांकडून जास्त दर घेऊन फसवणूक केल्या जात आहे. नागरिकांनी फसवणूक होऊ नये, याकरिता नगर परिषद कार्यालयातील जुने आरोग्य विभाग, वाचनालयाच्या बाजुला कक्षाची स्थापना केली आहे. तेथे अर्ज देण्यापासून स्वीकारण्यापर्यंत मार्गदर्शन केल्या जात आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांची या योजनेसाठी अर्ज भरुन देण्यासाठी फी आकारुन लूट होऊ शकते. त्याकरिता नगर परिषदेमध्ये स्वतंत्र केंद्र उभारले असून, कोणत्याही प्रकारची फी घेण्यात येत नाही.- विनय देशमुख, नगर अभियंता, नगर परिषद, वाशिमसर्वांसाठी घरे-२०२२ या योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदीसह लाभार्थींचे छापील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरु झाली आहे. आपण याचा आढावा घेतला असता नागरिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी शेकडो अर्ज येणे व नागरिकांनी चौकशी करणे या योजनेचे फलीत आहे.- गणेश शेट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम