शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच राजेशला गाठले मृत्यूने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:15 IST

पोहा येथील घटना : जेवत असताना झाला सर्पदंश

प्रफुल्ल बानगावकर । लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : नियमित स्वरूपात नोकरी मिळावी, यासाठी त्याने अनेक दिवस तुटपुंजा मानधनावर एका खासगी बँकेत इमानेइतबारे कार्य केले. त्याच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन बँकेनेदेखील त्यास कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तो १९ जुलैला रुजू होणार होता. मात्र, १८ जुलैच्या सायंकाळी जेवत असताना पायाला झालेल्या सर्पदंशामुळे नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले. राजेश रतन राठोड (वय ३५ वर्षे, रा. पोहा, ता. कारंजा) असे नाव असलेल्या या युवकाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे उभे गाव हळहळले आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका बँकेत रोजंदारीवर नोकरी करित होता. १९ जुलैपासून मात्र बँकेने त्याला कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तो तयारीत असतानाच १८ जुलैच्या सायंकाळी घरात जेवन करीत असताना राजेशच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. त्यामुळे त्यास प्राथमिक उपचाराकरिता प्रथम ग्रामीण रुग्णालय आणि तेथून अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. राजेश राठोड याच्या पश्चात पत्नी, एक छोटी मुलगी, वृद्ध आई-वडील आणि आप्त परिवार आहे. त्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून, गावातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.