शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘बॅरेजेस’मुळे अडले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 7, 2017 01:10 IST

सिंचनाची सोय : पैनगंगा नदीतील पाण्यामुळे शेतकरी सुखावले!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष भरून काढण्यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’मुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. यंदा केवळ दोन वेळा झालेल्या मोठ्या पावसानंतर बॅरेजेस क्षेत्रात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येत असून, जिल्ह्यात पूर्वीपासूनच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रुवारी २००९ रोजी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. शासनानेदेखील या कामांकडे विशेष लक्ष पुरविल्यामुळे सध्या सर्वच बॅरेजेसची कामे पूर्ण होऊन त्यात जलसाठा होऊ लागला आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्याने बॅरेज परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखालीवाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेस प्रकल्पांमुळे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, यासाठी केवळ ३७२.५७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. पैनगंगा नदीवर नव्यानेच उभारण्यात आलेल्या बॅरेज प्रकल्पांमध्ये यंदा मोठा जलसाठा निर्माण होणार असून, नजीकच्या शेतजमिनींचे नुकसान होऊ नये अथवा प्रकल्पांचे दरवाजे बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याची जलसंपदा विभागाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यासह हे प्रकल्प नवेच असल्यामुळे बांधकामात कुठे काही त्रुटी राहिल्यात काय, याचीही चाचपणी केली जाते.