शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

‘बॅरेजेस’मुळे अडले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 7, 2017 01:10 IST

सिंचनाची सोय : पैनगंगा नदीतील पाण्यामुळे शेतकरी सुखावले!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष भरून काढण्यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’मुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. यंदा केवळ दोन वेळा झालेल्या मोठ्या पावसानंतर बॅरेजेस क्षेत्रात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येत असून, जिल्ह्यात पूर्वीपासूनच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रुवारी २००९ रोजी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. शासनानेदेखील या कामांकडे विशेष लक्ष पुरविल्यामुळे सध्या सर्वच बॅरेजेसची कामे पूर्ण होऊन त्यात जलसाठा होऊ लागला आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्याने बॅरेज परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखालीवाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेस प्रकल्पांमुळे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, यासाठी केवळ ३७२.५७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. पैनगंगा नदीवर नव्यानेच उभारण्यात आलेल्या बॅरेज प्रकल्पांमध्ये यंदा मोठा जलसाठा निर्माण होणार असून, नजीकच्या शेतजमिनींचे नुकसान होऊ नये अथवा प्रकल्पांचे दरवाजे बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याची जलसंपदा विभागाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यासह हे प्रकल्प नवेच असल्यामुळे बांधकामात कुठे काही त्रुटी राहिल्यात काय, याचीही चाचपणी केली जाते.