शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू ...

पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू केला. अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, जमिनी खरडून गेल्या. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. गत पाच दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासह तण व्यवस्थापनाला वेग दिला. पिके चांगली सुधारली असतानाच बुधवार २८ जुलै रोजी दुपारपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी ही जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

------------

कीड नियंत्रण, तण व्यवस्थापनात खोडा

गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पिकांत तण वाढले आहे, तर किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाचे काम करीत आहेत ; परंतु बुधवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने या कामात आता खोडा निर्माण झाला असून, वेळेत ही कामे न केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

-----------

नुकसानाच्या सर्वेक्षणात अडचणी

गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांना फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पिकांसह खरडून गेल्या. संबंधित शेतकऱ्यांनी या संदर्भात पीक विमा कंपनीसह प्रशासनाकडे तक्रारी करीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या अर्जानुसार पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन पंचनाम्यात गुंतले असताना आता पावसामुळे त्यात अडचणी येत आहेत.

---------

पावसाने ओलांडली सरासरी

जिल्ह्यात १ जून ते २९ जुलै दरम्यान ३९४.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो, प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५३२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अर्थात आवश्यक सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात पडला आहे. पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडल्याने जलस्त्रोतांची पातळी वाढली असली तरी सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्याने ही पिकांना धोका आहे.

-----------

कोट : आधी १५ ते २० दिवस दडी मारणाऱ्या पावसाने आता त्रस्त केले आहे. अवघे चारच दिवस उघडीप मिळाल्यानंतर पावसाने बुधवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे विविध कामांत खोडा निर्माण झाला असून, अतिपावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती आहे.

-नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

------

कोट : पावसाचे प्रमाण सद्यस्थितीत चांगले आहे ; परंतु बुधवारपासून पुन्हा हजेरी लावणाऱ्या पावसाचा मुक्काम वाढल्यास पिके संकटात सापडण्याची भीती आहे. शिवाय पावसामुळे पीक व्यवस्थापनाच्या कामात ही सतत खोडा निर्माण होत आहे.

-घनशाम ढोक,

शेतकरी, इंझोरी