शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू ...

पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू केला. अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, जमिनी खरडून गेल्या. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. गत पाच दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासह तण व्यवस्थापनाला वेग दिला. पिके चांगली सुधारली असतानाच बुधवार २८ जुलै रोजी दुपारपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी ही जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

------------

कीड नियंत्रण, तण व्यवस्थापनात खोडा

गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पिकांत तण वाढले आहे, तर किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाचे काम करीत आहेत ; परंतु बुधवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने या कामात आता खोडा निर्माण झाला असून, वेळेत ही कामे न केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

-----------

नुकसानाच्या सर्वेक्षणात अडचणी

गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांना फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पिकांसह खरडून गेल्या. संबंधित शेतकऱ्यांनी या संदर्भात पीक विमा कंपनीसह प्रशासनाकडे तक्रारी करीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या अर्जानुसार पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन पंचनाम्यात गुंतले असताना आता पावसामुळे त्यात अडचणी येत आहेत.

---------

पावसाने ओलांडली सरासरी

जिल्ह्यात १ जून ते २९ जुलै दरम्यान ३९४.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो, प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५३२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अर्थात आवश्यक सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात पडला आहे. पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडल्याने जलस्त्रोतांची पातळी वाढली असली तरी सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्याने ही पिकांना धोका आहे.

-----------

कोट : आधी १५ ते २० दिवस दडी मारणाऱ्या पावसाने आता त्रस्त केले आहे. अवघे चारच दिवस उघडीप मिळाल्यानंतर पावसाने बुधवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे विविध कामांत खोडा निर्माण झाला असून, अतिपावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती आहे.

-नितीन पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

------

कोट : पावसाचे प्रमाण सद्यस्थितीत चांगले आहे ; परंतु बुधवारपासून पुन्हा हजेरी लावणाऱ्या पावसाचा मुक्काम वाढल्यास पिके संकटात सापडण्याची भीती आहे. शिवाय पावसामुळे पीक व्यवस्थापनाच्या कामात ही सतत खोडा निर्माण होत आहे.

-घनशाम ढोक,

शेतकरी, इंझोरी