शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतीची कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून ...

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून जे काही वाचले त्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. मात्र १९ मार्चपासून सलग २३ मार्चपर्यंत पाच दिवस थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने जे काही शिल्लक होते तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचे कांदा बिजवाई पीक, भाजीपालावर्गीय पीक, गहू, मका, ज्वारी तसेच टरबूज, खरबूज, केळी,आंबा नींबू, चिकू,पपई फळबागांचे १९ मार्च रोजी झालेल्या गारपीट व वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. यातूनही जे काही थोडेफार वाचले होते ते सावरण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत होते. मात्र सलग पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोड्याफार पावसाने यामध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच हळद काढणीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड व्यत्यय येत आहे. निसर्गाच्या या लहरी पणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च व कष्ट केल्यानंतर हातातोंडाशी येणारे पीक नैसर्गिक संकटामुळे हातचे निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. १९ मार्चपासून निर्माण झालेले ढगाळ व पावसाळी वातावरण कधी बदलणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. बँकांचे बिनव्याजी पीक कर्ज भरण्याच्या मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. त्यातच गारपिटीने नुकसान झाले. आता पीक कर्ज कसे भरावे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

..............................

नुकसान भरपाईची मागणी

शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद अशी खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकांकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.