शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसामुळे शेतीची कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून ...

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून जे काही वाचले त्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. मात्र १९ मार्चपासून सलग २३ मार्चपर्यंत पाच दिवस थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने जे काही शिल्लक होते तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचे कांदा बिजवाई पीक, भाजीपालावर्गीय पीक, गहू, मका, ज्वारी तसेच टरबूज, खरबूज, केळी,आंबा नींबू, चिकू,पपई फळबागांचे १९ मार्च रोजी झालेल्या गारपीट व वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. यातूनही जे काही थोडेफार वाचले होते ते सावरण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत होते. मात्र सलग पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोड्याफार पावसाने यामध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच हळद काढणीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड व्यत्यय येत आहे. निसर्गाच्या या लहरी पणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च व कष्ट केल्यानंतर हातातोंडाशी येणारे पीक नैसर्गिक संकटामुळे हातचे निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. १९ मार्चपासून निर्माण झालेले ढगाळ व पावसाळी वातावरण कधी बदलणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. बँकांचे बिनव्याजी पीक कर्ज भरण्याच्या मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. त्यातच गारपिटीने नुकसान झाले. आता पीक कर्ज कसे भरावे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

..............................

नुकसान भरपाईची मागणी

शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद अशी खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकांकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.