शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पावसामुळे शेतीची कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून ...

शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून जे काही वाचले त्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. मात्र १९ मार्चपासून सलग २३ मार्चपर्यंत पाच दिवस थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने जे काही शिल्लक होते तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचे कांदा बिजवाई पीक, भाजीपालावर्गीय पीक, गहू, मका, ज्वारी तसेच टरबूज, खरबूज, केळी,आंबा नींबू, चिकू,पपई फळबागांचे १९ मार्च रोजी झालेल्या गारपीट व वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. यातूनही जे काही थोडेफार वाचले होते ते सावरण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत होते. मात्र सलग पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोड्याफार पावसाने यामध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच हळद काढणीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड व्यत्यय येत आहे. निसर्गाच्या या लहरी पणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च व कष्ट केल्यानंतर हातातोंडाशी येणारे पीक नैसर्गिक संकटामुळे हातचे निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. १९ मार्चपासून निर्माण झालेले ढगाळ व पावसाळी वातावरण कधी बदलणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. बँकांचे बिनव्याजी पीक कर्ज भरण्याच्या मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. त्यातच गारपिटीने नुकसान झाले. आता पीक कर्ज कसे भरावे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

..............................

नुकसान भरपाईची मागणी

शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद अशी खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकांकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.