शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दुस-या दिवशीही संततधार पाऊस!

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

नदी-नाल्यांना पूर : जनजीवन प्रभावित; सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ.

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने सलग दुसर्‍या दिवशीही मंगळवार, २६ जुलैला हजेरी लावली. तथापि, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात होत असलेल्या या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पिकांना धोका उद्भवला असून, जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर रात्रीच्या सुमारास विश्रांती घेतली. मंगळवारी पुन्हा दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास धुवाधार कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी वाहत असून, सर्वच जलस्रोतांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेलुखडसे (ता. रिसोड) या गावाला पुराने वेढल्यामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरा पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम शहरातील शिवाजी चौकस्थित छोट्या नाल्यांनादेखील मोठा पूर आला. या पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम प्रकल्पांसह १२२ लघू प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्यासोबतच नव्याने उभारण्यात आलेल्या पैनगंगा नदीवरील अकराही बॅरेजेस प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, यंदा पावसाने दरवर्षीची सरासरी ओलांडली असून, पावसाचे अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाण झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना काहीअंशी धोका संभवत असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.