शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

वाशिम जिल्ह्यात दुस-या दिवशीही संततधार पाऊस!

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

नदी-नाल्यांना पूर : जनजीवन प्रभावित; सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ.

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने सलग दुसर्‍या दिवशीही मंगळवार, २६ जुलैला हजेरी लावली. तथापि, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात होत असलेल्या या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पिकांना धोका उद्भवला असून, जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर रात्रीच्या सुमारास विश्रांती घेतली. मंगळवारी पुन्हा दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास धुवाधार कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी वाहत असून, सर्वच जलस्रोतांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेलुखडसे (ता. रिसोड) या गावाला पुराने वेढल्यामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरा पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम शहरातील शिवाजी चौकस्थित छोट्या नाल्यांनादेखील मोठा पूर आला. या पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम प्रकल्पांसह १२२ लघू प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्यासोबतच नव्याने उभारण्यात आलेल्या पैनगंगा नदीवरील अकराही बॅरेजेस प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, यंदा पावसाने दरवर्षीची सरासरी ओलांडली असून, पावसाचे अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाण झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना काहीअंशी धोका संभवत असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.