शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पावसाची सरासरी १०३ टक्के, ३५ प्रकल्प निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही ...

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही जलसाठा झाला नाही, केवळ ४९ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सिंचनासह पाणीटंचाईची समस्या काही भागांत उद्भवण्याची भिती आहे.

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला नाही, परंतु मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले होते. जून महिन्यात पावसाची अपेक्षित अशी नोंद झाली नाही, तर जुलै महिन्यात पावसाने दीर्घकाळ खंड दिला. त्यामुळे पेरण्या उलटण्याची आणि कोरडा दुष्काळाची भीतीही वाटू लागली होती. तथापि, जुलैच्या मध्यंतरापासून आणि ऑगस्ट महिन्यातही पूर्वार्धात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने धडाका लावल्याने पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तथापि, पावसाळा संपण्यास आता अवघे २३ दिवस उरले असतानाच जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

०००००००००००००

तिन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर

जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ७६ टक्के जलसाठा झाला आहे, तर जिल्ह्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाल्याने मालेगाव तालुक्यातील सोनल आणि वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत.

०००००००००००००

वाशिम तालुक्यात पाऊस व जलसाठा सर्वात कमी

जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांत सरासरी ७८ टक्के जलसाठा झाला असला तरी वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असल्याने या तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत केवळ ४५ टक्केही जलसाठा झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येण्याची शक्यता आहे.

०००००००००००००

गत २४ तासांत ४७.७० मि.मी. पाऊस

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण सरासरी ९७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता होतीच. त्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपासून ते ७ सप्टेंबर सकाळपर्यंतच्या २५ तासांत जिल्ह्यात ४७.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०३ टक्क्यांवर पोहोचली.

००००००००००००००००००

-जिल्ह्यातील एकूण प्रकल्प - १३७

-एकूण जलसाठा - ७७.८७ टक्के

- मध्यम प्रकल्पातील जलसाठा - १००

- लघू प्रकल्पातील जलसाठा - ६५.४३

००००००००००००००००००००००००००००००००

० ते ५० टक्क्यांपर्यंत साठा असलेले तालुकानिहाय प्रकल्प

तालुका - प्रकल्प

वाशिम - २२

मालेगाव - ०१

कारंजा - ०२

मंगरुळपीर - ०१

रिसोड - ०७

मानोरा - ०१

--------------------