शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पावसाची सरासरी १०३ टक्के, ३५ प्रकल्प निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही ...

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही जलसाठा झाला नाही, केवळ ४९ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सिंचनासह पाणीटंचाईची समस्या काही भागांत उद्भवण्याची भिती आहे.

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला नाही, परंतु मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले होते. जून महिन्यात पावसाची अपेक्षित अशी नोंद झाली नाही, तर जुलै महिन्यात पावसाने दीर्घकाळ खंड दिला. त्यामुळे पेरण्या उलटण्याची आणि कोरडा दुष्काळाची भीतीही वाटू लागली होती. तथापि, जुलैच्या मध्यंतरापासून आणि ऑगस्ट महिन्यातही पूर्वार्धात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने धडाका लावल्याने पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तथापि, पावसाळा संपण्यास आता अवघे २३ दिवस उरले असतानाच जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

०००००००००००००

तिन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर

जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ७६ टक्के जलसाठा झाला आहे, तर जिल्ह्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाल्याने मालेगाव तालुक्यातील सोनल आणि वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत.

०००००००००००००

वाशिम तालुक्यात पाऊस व जलसाठा सर्वात कमी

जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांत सरासरी ७८ टक्के जलसाठा झाला असला तरी वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असल्याने या तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत केवळ ४५ टक्केही जलसाठा झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येण्याची शक्यता आहे.

०००००००००००००

गत २४ तासांत ४७.७० मि.मी. पाऊस

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण सरासरी ९७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता होतीच. त्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपासून ते ७ सप्टेंबर सकाळपर्यंतच्या २५ तासांत जिल्ह्यात ४७.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०३ टक्क्यांवर पोहोचली.

००००००००००००००००००

-जिल्ह्यातील एकूण प्रकल्प - १३७

-एकूण जलसाठा - ७७.८७ टक्के

- मध्यम प्रकल्पातील जलसाठा - १००

- लघू प्रकल्पातील जलसाठा - ६५.४३

००००००००००००००००००००००००००००००००

० ते ५० टक्क्यांपर्यंत साठा असलेले तालुकानिहाय प्रकल्प

तालुका - प्रकल्प

वाशिम - २२

मालेगाव - ०१

कारंजा - ०२

मंगरुळपीर - ०१

रिसोड - ०७

मानोरा - ०१

--------------------