शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पावसामुळे पूल वाहून गेला; शिरपूर-वाशिम मार्ग बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शिरपूर ते वाशिम रस्त्यावरील ब्राह्मणवाडा येथील नाल्यावरील पुलाचा एक भाग वाहून गेला. तेव्हापासून या रस्त्यावरील ...

जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शिरपूर ते वाशिम रस्त्यावरील ब्राह्मणवाडा येथील नाल्यावरील पुलाचा एक भाग वाहून गेला. तेव्हापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. मात्र, काही प्रमाणात पुलाचा भाग कायम असल्याने दुचाकी वाहतूक सुरू होती. या धोकादायक पुलावरून शेकडो शासकीय कर्मचारी, व्यापारी, शालेय विद्यार्थी व नागरिक दुचाकीने शिरपूर -वाशिम -शिरपूर असा प्रवास करीत असत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यातच मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवार १९ ऑगस्ट रोजी पुलाचा उरलासुरला भागही पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शिरपूर - वाशिम रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीसह परिसरातील इतरही पूल पावसामुळे खचून गेले आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

०००००००००००

पूल दुरुस्तीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

पूल दुरुस्तीसंदर्भात २२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला मुठ्ठा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश चांडे यांनी निवेदन दिले होते. मात्र, याकडे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. ब्राह्मणवाडा येथील वाहून गेलेल्या पुलामुळे ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती निलेश चांडे यांनी दिली आहे.