शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: July 1, 2014 02:37 IST

वाशिम जिल्हय़ात ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या

वाशिम : जून महिना संपला तरी अद्यापपर्यंत जिल्हय़ात शेतकर्‍यांना दिलासा देणारा पाऊस पडलेला नाही. ओलिताची थोडीफार सोय असणार्‍या काही भागातील शेतकर्‍यांनी चार टक्के क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या; परंतु आता विहिरीचे पाणी आटल्याने त्यांच्या पेरण्या पाण्याअभावी उलटण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या असून, यावर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी हातचा जाण्याच्या भीतीने जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्हय़ात मागील वर्षी सन २0१२ च्या पावसाळय़ात जिल्हय़ाच्या वार्षिक पावसाच्या सरासरीच्या १५0 टक्के एवढा पाऊस पडला होता. मागील वर्षी ६ जूनलाच पावसाची दमदार सुरुवात झाली होती. जून महिन्यातच पावसाळय़ात पडलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या निम्म्या एवढा पडला होता. त्यामुळे जून अखेर ८७ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. पिकेदेखील चांगली वाढीला लागली होती. यावर्षी स्थिती अगदी उलट आहे. जून महिन्यात जिल्हय़ात कुठे कुठे अगदी तुरळक स्वरुपात पाऊस पडला आहे. खरिपाच्या लागवडीखाली येणार्‍या जिल्हय़ातील ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी थोडीफार ओलिताची सोय असलेल्या १७ हजार हेक्टर चार टक्के क्षेत्रात शेतकर्‍यांनी जूनमध्ये पाऊस येणारच, असे गृहीत धरुन पेरण्या केल्या होत्या. परंतु संपूर्ण जून महिना उलटला तरीही अगदी नाममात्र आणि सरी स्वरुपाचा पाऊस झाला. मुरवणी स्वरुपाचा पाऊस अद्यापही झाला नसल्याने जिल्हय़ातील जवळपास चार लाख १0 हजार हेक्टर टक्के क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. उडीद, मुगाच्या पेरणीचा कालावधी आता उलटून गेला असून, आता जुलै महिन्यात पाऊस आला तर शेतकर्‍यांना सोयाबीन, कापूस, तूर व संकरित ज्वारीची पेरणी करावी लागणार आहे. तसेच यापूर्वी पेरणी केलेल्या १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्या सध्या पावसाअभावी करपून जात असल्याने त्या शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत. एकंदरीत आता जुलै महिन्यात येणार्‍या पावसानंतर जिल्हय़ातील जवळपास १00 टक्के शेतकर्‍यांना पेरण्या कराव्या लागणार आहेत. या दृष्टीने शेतकर्‍यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या असून, पाऊस कधी येतो, याची प्रतीक्षा हवालदिल शेतकरी करीत आहेत.