शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 30, 2017 01:31 IST

कारंजा तालुका : ५० हजार हेक्टरवर झाली पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यंदा पावसाने कमी- जास्त प्रमाणात तालुक्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. यासोबतच हवामान खात्याकडून यावर्षी दमदार पाऊस होणार असल्यााचे संकेत मिळत होते. हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून तालुक्यातील ७० हजार १०० हेक्टरपैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी केली; परंतु १५ जुनपाससून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे काही अंकुरले तर काही वसुंधरेच्याा कुशीतून बाहेर आले; मात्र या इवल्याशा पिकांना पाणी नसल्याने व दुपारी तापमानात वाढ होत असल्याने पिके कोमजली जात असून, संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारंजा तालुक्यात एकूण आठ महसूल मंडळे असून, त्यामध्ये कारंजा, कामरगाव, धनज, खेर्डा हिवरा लाहे, येवता बंदी, पोहा व उंबर्डा, बाजार या मंडळचा समावेश आहे. यातील प्रत्येक महसूल मंडळापैकी काही गावात १५ जून रोजी पाऊस आल्याने १६ जूनपासून पेरण्यांना वेग आला. काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने आगामी काळात पाऊस येईल, या आशेने कारंजा तालुक्यातील एकूण ७० हजार १०० हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास ५० हजार हेक्टरवर म्हणजेच ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. तर उर्वरित क्षेत्रावरील खरिपाची पेरणी रखडली आहे. कारंजा तालुक्यात आतापर्यंत ९९.५२ तर मंडळनिहाय ९१.११ पर्जन्यमान झाले आहे. अशातच गुरुवारी २२ जून रोजी सायंकाळी कारंजा शहरासह काही भागात पाऊस आल्याने या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी पेरणी केलेल्या पिकांना त्यानंतर पाऊस न आल्याने धोका निर्माण झाला आहे तर २२ जून रोजी आलेला पाऊस सार्वत्रिक नसल्याने ज्या भागात पाऊस पडला ती पिके सोडून इतर भागातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नाही तर पेरण्या उलटू शकतात; मात्र असे असले तरी आणखी काही दिवस पाऊस न आल्यास पाऊस पडलेल्या भागातील पिकेदेखील संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांनी दिली.