शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

By नंदकिशोर नारे | Updated: November 15, 2022 14:19 IST

निवडणुकीसाठी नव्हे तर देशातील विविध समस्यांबाबत जनजागरण, कॉंग्रेसचे जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम : देश सध्या विविध संकटांच्या विळख्यात सापडला असून सर्वसामान्य जनतेला महागाई, सुरक्षसह अनेक समस्या भेड़सावत आहेत. यासाठीच कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून सदर भारत जोडो यात्रेला विविध राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे अशी माहिती जयराम रमेश यांनी हॉटेल इव्हेटो येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकुर,खासदार प्रणीति शिंदे,आमदार प्रज्ञा सातव आदि उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की,राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही निवडणुक प्रचारासाठी नव्हे तर देशामध्ये वाढत असलेली महागाई,शेतकऱ्यांच्या समस्या,महिलांवरील अत्याचार,देशात वाढता असंतोष याबाबत जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोडो यात्रा सुरु असल्याचे म्हटले.भारत जोडो यात्रेला खुप मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत असून ७० टक्के महिलां या यात्रेत सहभागी होत असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.

चिमुकलीची गोड भेट 

भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून स्वरा सुमित मिटकरी या  चिमुकलीने तयारी केली ती फक्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी ... सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वराला  कडेवर घेऊन सवांद साधला.... राहुल गांधी यांनी स्वराला कितवी मध्ये आहे, भविष्यात काय करायचं आहे असे अनेक प्रश्न  विचारले, स्वरानेही सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम तडफेने दिली 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा