शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन!

By admin | Updated: October 16, 2015 02:01 IST

कोरडवाहू शेतकरी संकटात; जमिनीत ओलच नाही!

वाशिम: खरिपात निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरलेला बळीराजा रब्बी हंगामात स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नातून मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे, तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांसमोर नादुरूस्त विद्युत रोहित्राने नवीन संकट निर्माण केले आहे. निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील पिके हातची गेली. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर ओढवली आहे. आता शेतकर्‍यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७0 हजार ८९१ हेक्टरवर हरभर्‍याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गहू पिकाचा पेरा २६ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी दोन हजार हेक्टर, मका ४00 हेक्टर, सूर्यफूल १६00 हेक्टर असे एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. गतवर्षी ७७ हजार ११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस असतानाही कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. रिसोड तालुक्यात सर्वाधिक ३0 हजार ९00 हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तविला असून, त्याखालोखाल वाशिम २१ हजार ४00 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.