शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन!

By admin | Updated: October 16, 2015 02:01 IST

कोरडवाहू शेतकरी संकटात; जमिनीत ओलच नाही!

वाशिम: खरिपात निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरलेला बळीराजा रब्बी हंगामात स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नातून मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे, तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांसमोर नादुरूस्त विद्युत रोहित्राने नवीन संकट निर्माण केले आहे. निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील पिके हातची गेली. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर ओढवली आहे. आता शेतकर्‍यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७0 हजार ८९१ हेक्टरवर हरभर्‍याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गहू पिकाचा पेरा २६ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी दोन हजार हेक्टर, मका ४00 हेक्टर, सूर्यफूल १६00 हेक्टर असे एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. गतवर्षी ७७ हजार ११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस असतानाही कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. रिसोड तालुक्यात सर्वाधिक ३0 हजार ९00 हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तविला असून, त्याखालोखाल वाशिम २१ हजार ४00 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.