शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन!

By admin | Updated: October 16, 2015 02:01 IST

कोरडवाहू शेतकरी संकटात; जमिनीत ओलच नाही!

वाशिम: खरिपात निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरलेला बळीराजा रब्बी हंगामात स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नातून मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे, तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांसमोर नादुरूस्त विद्युत रोहित्राने नवीन संकट निर्माण केले आहे. निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील पिके हातची गेली. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर ओढवली आहे. आता शेतकर्‍यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७0 हजार ८९१ हेक्टरवर हरभर्‍याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गहू पिकाचा पेरा २६ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी दोन हजार हेक्टर, मका ४00 हेक्टर, सूर्यफूल १६00 हेक्टर असे एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. गतवर्षी ७७ हजार ११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस असतानाही कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. रिसोड तालुक्यात सर्वाधिक ३0 हजार ९00 हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तविला असून, त्याखालोखाल वाशिम २१ हजार ४00 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.