शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

वाशिममध्ये रब्बी पीकविम्याचे प्रमाण १७ टक्क्यांवर!

By admin | Updated: January 7, 2017 19:44 IST

नोटाबंदीनंतर पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाण घसरून केवळ १७ टक्क्यांवर आले आहे

सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ -  ऐन रब्बी हंगामाच्या सुरूवातीला ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. त्यामुळे खरिपातील शेतमाल विक्रीतून चालणा-या रोखीच्या व्यवहारांवर टाच बसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा पेरा १४ हजार ६०० हेक्टरने वाढला असला तरी कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण मात्र ५,८०० ने घटले असून पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाणही केवळ १७ टक्क्यांवर आले आहे. 
 
जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना त्यांनी पेरलेल्या पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे.  तथापि, गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ९९५ शेतकºयांनी रब्बी हंगामात ४३ कोटी ५४ लाख रुपये कर्जाची उचल केली होती. ते सर्व शेतकरी प्रधानमंत्री पिकविमा योजनेकरिता आपसूकच पात्र ठरले होते. चालूवर्षी मात्र कर्जाची उचल करणाºया शेतकºयांचे प्रमाण आजमितीस केवळ १ हजार १९३ असून तेवढ्याच शेतकºयांचा थेट प्रधानमंत्री पिकविमा योजनेत समावेश झाला आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच शेतकºयाने अद्यापपर्यंत पिकविमा योजनेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.
 
मुदतवाढीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
 
रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि करडई या पिकांकरिता लागू असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पूर्वी ३१ डिसेंबर ही अंतीम मुदत होती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकºयांना पीक विम्याचा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने विहित मुदतीत या योजनेस शेतकºयांमधून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासनाने योजनेस १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याऊपरही जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के शेतकºयांनी अद्याप विमा योजनेत सहभाग नोंदविलेला नाही. 
 
 
चलनातून ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द ठरविण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर झाला. त्यानंतर सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने शेतकरी पीककर्ज वाटप प्रक्रियेसह पीकविमा हप्ता भरण्याच्या प्रक्रियेस बहुतांशी खीळ बसली. त्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे.
व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम