शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वाशिममध्ये रब्बी पीकविम्याचे प्रमाण १७ टक्क्यांवर!

By admin | Updated: January 7, 2017 19:44 IST

नोटाबंदीनंतर पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाण घसरून केवळ १७ टक्क्यांवर आले आहे

सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ -  ऐन रब्बी हंगामाच्या सुरूवातीला ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. त्यामुळे खरिपातील शेतमाल विक्रीतून चालणा-या रोखीच्या व्यवहारांवर टाच बसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा पेरा १४ हजार ६०० हेक्टरने वाढला असला तरी कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण मात्र ५,८०० ने घटले असून पिकविमा घेणाºया शेतकºयांचे प्रमाणही केवळ १७ टक्क्यांवर आले आहे. 
 
जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना त्यांनी पेरलेल्या पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक आहे.  तथापि, गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ९९५ शेतकºयांनी रब्बी हंगामात ४३ कोटी ५४ लाख रुपये कर्जाची उचल केली होती. ते सर्व शेतकरी प्रधानमंत्री पिकविमा योजनेकरिता आपसूकच पात्र ठरले होते. चालूवर्षी मात्र कर्जाची उचल करणाºया शेतकºयांचे प्रमाण आजमितीस केवळ १ हजार १९३ असून तेवढ्याच शेतकºयांचा थेट प्रधानमंत्री पिकविमा योजनेत समावेश झाला आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच शेतकºयाने अद्यापपर्यंत पिकविमा योजनेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.
 
मुदतवाढीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
 
रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि करडई या पिकांकरिता लागू असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पूर्वी ३१ डिसेंबर ही अंतीम मुदत होती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकºयांना पीक विम्याचा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने विहित मुदतीत या योजनेस शेतकºयांमधून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासनाने योजनेस १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याऊपरही जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के शेतकºयांनी अद्याप विमा योजनेत सहभाग नोंदविलेला नाही. 
 
 
चलनातून ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द ठरविण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर झाला. त्यानंतर सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्याने शेतकरी पीककर्ज वाटप प्रक्रियेसह पीकविमा हप्ता भरण्याच्या प्रक्रियेस बहुतांशी खीळ बसली. त्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे.
व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम