शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST

वाशिम : पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात ...

वाशिम : पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागते. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करता-करता, शेतकरी थकूनही जातो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही अपेक्षापूर्ती होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना खडीकरणाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळ्यात पाऊस आला की, पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने, चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशा बिकट परिस्थितीत शेतमाल घरी कसा आणावा, या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडते. काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यांअभावी वेळेवर शेतमाल घरीही आणता येत नाही. रस्त्यावरील चिखल नाहीसा झाल्यानंतर, शेतमाल घरी आणावा लागतो. पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीच तरतूद होणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, गत दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात निधीची तरतूद नसल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. शेतात चिखल तुडवत जावे लागत असल्याने, शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

०००००००००००००

निधी केव्हा मिळणार?

पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पावसाळ्यात पाणंद रस्त्यांवर किमान मुरुम टाकून गैरसोय दूर करावी, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

००००

पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघावा!

कोट

शेतात जाण्यासाठी खडीकरणाचा पाणंद रस्ता नाही. त्यामुळे चिखल तुडवत शेतात जावे लागते. पाणंद रस्त्याकडे शासन, प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

- समाधान वानखडे, शेतकरी, चिखली

०००

खडीकरणाचा पाणंद रस्ता नसल्याने शेतात जाताना, विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने याचा त्रास इतर शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

- प्रवीण सरनाईक, शेतकरी, रिसोड

००००

पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली केव्हा निघणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. खडीकरणाचा रस्ता असेल, तर पावसाळ्यात शेतमाल घरी आणणे अधिक सुलभ होते.

- उमेश अवचार, शेतकरी, डही